बुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन जोडण्याबाबत मंगळवारी (ता. ३०) भाजपने आंदोलनाचा इशारा दिल्याची दखल घेत महावितरणने कनेक्शन पूर्ववत करीत असल्याचे लेखी पत्र कार्यकर्त्यांना दिले. आमदार डॉ. संजय कुटे यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जाणार होते. तत्पूर्वीच हे पत्र देण्यात आले.
जळगाव जामोद उपविभागात सक्तीच्या वीजबिल वसुलीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहे. वीजबिल वसुलीसाठी वीजकनेक्शन कापले जात आहेत. रोहित्र बंद ठेवण्यात येत असल्याने रब्बी पिके संकटात सापडली होती. या मुद्यावर भाजपच्या वतीने २५ नोव्हेंबरला निवेदन देत मंगळवारी आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलन पाहता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांसोबत चर्चा करून तातडीने तोडगा काढला.
कृषिपंपाचे तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत जोडण्यात येत आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता कृषिपंपाची वसुली थांबविण्यात येत आहे. जळालेले रोहित्र बदलून देण्यासाठी किमान चालू देयके भरावे, तसेच कृषिपंपाच्या बिल वसुलीसाठी तूर्तास रोहित्रे बंद करणे थांबविण्यात येत आहे, असे लेखी पत्र उपकार्यकारी अभियंत्यांनी दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.