सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप 

सातारा जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत सहा कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली आहे. उर्वरित नऊ कारखान्यांचा गाळप अंतिम टप्प्यात आले आहे.
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप Urakle Mill by six factories; 97 lakh 38 thousand tons of sugarcane crushing
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप Urakle Mill by six factories; 97 lakh 38 thousand tons of sugarcane crushing

सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत सहा कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली आहे. उर्वरित नऊ कारखान्यांचा गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत ९७ लाख ३८ हजार टन उसाचे गाळप करून १ कोटी ९ लाख ३६ हजार क्विंटल विक्रमी साखरेची निर्मिती केली आहे. साखर निर्मितीत जिल्ह्याने कोटीचे उड्डाण केले आहे. सर्वाधिक साखर उतारा सह्याद्री साखर कारखान्याला मिळाला असून, गाळपात जरंडेश्‍वर कारखान्याची आघाडी राहिली आहे. 

कोरोनाच्या महामारीतही साखर हंगाम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत सहा साखर कारखान्यांचे गळीत संपले आहे. यामध्ये श्रीराम साखर कारखाना फलटण, बाळासाहेब देसाई कारखाना पाटण, रयत साखर कारखाना कऱ्हाड, ग्रीन पॉवर शुगर गोपूज खटाव, स्वराज्य इंडिया ॲग्रो, खटाव-माण ॲग्रो प्रोसेसिंग पडळ, या कारखान्यांचा समावेश आहे. या गाळप हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होता; पण अनेक कारखान्यांची तोडणी व वाहतूक यंत्रणा विस्कळित असूनही चांगल्या पद्धतीने गळीत यशस्वी केले आहे. सहकारी तीन व खासगी तीन कारखान्यांचे गळीत पूर्ण झाले आहे.

उर्वरित नऊ कारखान्यांचे गाळप अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत या सर्व कारखान्यांनी मिळून ९७ लाख ३८ हजार ७४४ टन उसाचे गाळप करून १ कोटी ९ लाख ३६ हजार ९४० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. सरासरी साखर उतारा ११.२३ टक्के मिळाला आहे. यामध्ये खासगी कारखान्यांनी एकूण ५० लाख ९६ हजार १८७ टन उसाचे गाळप करून ५४ लाख १८ हजार ३४५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे, तर सहकारी साखर कारखान्यांनी ४६ लाख ४२ हजार ५५७ टन उसाचे गाळप करून ५५ लाख १८ हजार ५९५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. 

या वर्षी ऊस गाळपात कोरेगाव तालुक्‍यातील जरंडेश्‍वर शुगरने आघाडी घेत १४ लाख १९ हजार ६६० टन उसाचे गाळप करून १६ लाख २७ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केलेली आहे, तर साखर उताऱ्यात सह्याद्री साखर कारखान्याने आघाडी घेत १२.६५ टक्के उतारा मिळाला आहे. 

कारखानानिहाय ऊस गाळप (टन) आणि कंसात साखरनिर्मिती (क्विंटल)  श्रीराम कारखाना : ४,५७,१४२ (५,३४,८७०), कृष्णा कारखाना १२,००,६५० (१४,५०,३७०), किसन वीर वाई ४,१६,०६८ (३,८२,८००), बाळासाहेब देसाई कारखाना २,३३,३२६ (२,७८,५७५), सह्याद्री कारखाना ११,९७,००० (१५,१३,९८०), अजिंक्‍यतारा कारखाना ६,५१,१४० (७,७२,९५०), रयत अथणी शुगर ४,६०,१३१ (५,६८,०००), खंडाळा कारखाना २७,१०० (१७,०५०), दत्ता इंडिया साखरवाडी ४,५०,२०२ (५,३६,३२०), जरंडेश्‍वर शुगर कोरेगाव १४,१९,६६० (१६,२७,०००), जयवंत शुगर कऱ्हाड ६,६८,५०५ (७,१८,९५०), ग्रीन पॉवर शुगर गोपुज खटाव ५,१४,०१२ (५,६७,१५०), स्वराज्य इंडिया ॲग्रो उपळवे ६,५२,४८० (५,६४,०७५), शरयू ॲग्रो कापशी, फलटण ८,३१,४२७ (७,८६,१५०), खटाव- माण ॲग्रो प्रोसेसिंग पडळ ५,५९,९०० (६,१८,७००).  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com