नाशिक जिल्ह्यात गरजेच्या वेळीच युरियाचा तुटवडा

नाशिक जिल्ह्यात गरजेच्या वेळीच युरियाचा तुटवडा
नाशिक जिल्ह्यात गरजेच्या वेळीच युरियाचा तुटवडा

नाशिक : खरीप हंगामातील सोयाबीन, मका, ऊस, भुईमूग, भाजीपाला आदी नगदी पिकांचा हंगाम सुरू आहे. सर्व पिके जोमदार वाढीला लागली असून, या पिकांना युरिया खताची आवश्यकता असल्याने शेतकऱ्यांची खरेदीसाठी धावपळ उडाली आहे. नेमके याचवेळी बहुतांश कृषी सेवा केंद्रांत युरियाचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खतांचा काळाबाजार होत असल्याने टंचाई निर्माण झाली असल्याची चर्चा आहे.

प्रत्येक वर्षी हंगामाच्या सुरवातीला मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध असतो. पिकांना आवश्यकता भासल्यास दुकानातील युरिया संपतो पुरवठादार, मोठे दुकानदार कृत्रिम टंचाई निर्माण करून नंतर जास्त भावात विक्री करतात. आजही काही दुकानात ४० किलोच्या गोणीसाठी ५० रुपये जास्त दिल्यास काही ठिकाणी युरिया उपलब्द होतो. अशा कृत्रिम टंचाईमुळे आर्थिक तोटा सहन करावा लागतो. युरिया सोबत अनेक रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत असल्याने कृषी विभागाच्या वतीने साठवण करणाऱ्या पुरवठादार आणि दुकानदारांच्या गोदामावर छापा टाकून कारवाही करून योग्य भावात खते उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com