शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील उपयुक्त पाण्यात दोन टक्क्यांनी घट
औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा गत आठवडाभरात जवळपास दोन टक्क्यांनी घटला आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील एकूण प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा गत आठवडाभरात जवळपास दोन टक्क्यांनी घटला आहे. दुसरीकडे कोरड्या पडलेल्या लघु प्रकल्पांची संख्याही एकाने वाढली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, १५ जानेवारीअखेर मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा ७८.५३ टक्के होता. २२ जानेवारीअखेर तो ७६.५३ टक्क्यांवर आला. दुसरीकडे १५ जानेवारीअखेर ६ असलेली कोरड्या लघु प्रकल्पांची संख्याही २२ जानेवारीअखेर ७ वर, तर जोत्याखालील लघु प्रकल्पांची संख्या २९ वरून ३४ वर पोचली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील ८७६ लघु, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांतील प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा २२ जानेवारीअखेर ७६.५३ टक्क्यांवर आला आहे. १५ जानेवारीअखेर हा उपयुक्त पाणीसाठा ७८.७७ टक्के होता.
१५ जानेवारीअखेर मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पातील ८४.५४ टक्के उपयुक्त पाणीसाठा २२ जानेवारीअखेर ८४.५४ टक्क्यांवर आला आहे. ७५ मध्यम प्रकल्पांतील ७६.१६ टक्के उपयुक्त पाणी ७३.०८ टक्क्यांवर आले आहे. ७५२ लघु प्रकल्पातील ५८.२७ टक्के उपयुक्त पाणीसाठा आता ५५.२९ टक्क्यांवर आला आहे.
औरंगाबादमधील ९६ लघू प्रकल्पांत ५८ टक्के उपयुक्त पाणी
७५२ लघु प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील ९६ प्रकल्पांत ५८ टक्के, जालना ५७ प्रकल्पांत ५१ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत ५९ टक्के, लातूरमधील १३२ प्रकल्पांत ५७ टक्के, उस्मानाबादमधील २०५ प्रकल्पांत ४८ टक्के, नांदेडमधील ८८ प्रकल्पांत ६४ टक्के, परभणीतील २२ प्रकल्पांत ६२ टक्के, तर हिंगोलीतील २६ लघु प्रकल्पांत ५७ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.
- 1 of 1055
- ››