अमरावती कृषी विभागातील ३२ टक्के पदे रिक्त

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  :  रिक्‍त पदांमुळे अमरावती कृषी विभाग अडचणीत आहे. विशेष म्हणजे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या जिल्ह्यातच सुमारे ३२ टक्‍के पदे रिक्‍त आहेत.

जिल्ह्यातील वरुड, मोर्शी हे तालुके संत्रा लागवडीत पुढारलेले आहेत. परंतू गेल्या काही वर्षांपासून या भागात सातत्याने निर्माण होणारी दुष्काळी स्थिती, संत्रा पिकावर येणारे कीड-रोग, आंबिया व मृग बहारातील फळांची गळ अशा अनेक समस्यांनी संत्रा उत्पादक हैराण झाले आहेत. राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठ तज्ज्ञांकडून या समस्यांच्या निवारणासाठी वेळीच उपाययोजनांची शिफारस केली जात नसल्याचा आरोपही शेतकरी करतात. त्यामुळे संत्रा उत्पादक व इतर पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची भिस्त कृषी विभागावर राहते. परंतू कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कृषी विभागात तब्बल ३२ टक्‍के पदे रिक्‍त आहेत.

याच जिल्ह्यात नजीकच्या काळात सिट्रस इस्टेटची अंमलबजावणी केली जाणार आहे. या माध्यमातून संत्रा बागायतदार शेतकऱ्यांना दर्जेदार रोपांच्या पुरवठ्यासोबतच मार्केटिंगपर्यंत मदत प्रस्तावित आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून या सिट्रस इस्टेटचे सनियंत्रण केले जाणार आहे. परंतू आधीच रिक्‍तपदांमुळे एका व्यक्‍तीकडे अनेक पदांच्या प्रभार असणाऱ्या कृषी विभागाच्या अडचणीत यामुळे भर पडली आहे. विशेष म्हणजे संत्रा लागवड क्षेत्र सर्वाधिक असताना याच जिल्ह्यात फलोत्पादन अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्‍त आहेत.  

पद मंजूर  रिक्‍त
अतिरिक्‍त प्रकल्प व्यवस्थापक
तालुका कृषी अधिकारी १४
जैविक कीड नियंत्रण अधिकारी
तंत्र अधिकारी ७ 
उप प्रकल्प व्यवस्थापक
मंडळ कृषी अधिकारी ३४ १६
फलोत्पादन अधिकारी
कृषी अधिकारी १९   १५
कृषी पर्यवेक्षक ९९ ४१
कृषी सहायक  ४४५  ६०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com