वर्धा जिल्ह्यात १५०० शेतकरी कुटुंबप्रमुख तणावात

वर्धा ः बेभरवश्‍याच्या शेती व्यवसायाने अनेकांची चिंता वाढीस लागली आहे. खर्च, उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबीय कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंब प्रमुख तणावात जीवन जगत असून वर्धा जिल्ह्यात असे १ हजार ५१० कुटुंब प्रमुख असल्याचे वास्तव समोर आले आहे.
1500 farmers in Bapu's district in depression
1500 farmers in Bapu's district in depression

वर्धा ः बेभरवश्‍याच्या शेती व्यवसायाने अनेकांची चिंता वाढीस लागली आहे. खर्च, उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नसल्याने अनेक शेतकरी कुटुंबीय कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत कुटुंब प्रमुख तणावात जीवन जगत असून वर्धा जिल्ह्यात असे १ हजार ५१० कुटुंब प्रमुख असल्याचे वास्तव समोर आले आहे. 

प्रेरणा प्रकल्पाच्या माध्यमातून वर्धा जिल्ह्याच्या आठ तालुक्‍यांतील १ हजार ३५ आशा वर्करव्दारे शेतकरी कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. तब्बल २ लाख ५ हजार कुटुंबीयांचा सर्व्हे या माध्यमातून करण्यात आला. त्यामध्ये दोन लाख २३ हजार ३६७ शेतकरी कुटुंबीयांकडून माहिती घेण्यात आली.

वर्धा तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत या कुटुंब प्रमुखांचा शोध घेण्यासाठी आशा वर्करच्या माध्यमातून ७३ हजार ४११ कुटुंबीयांची भेट घेण्यात आली. ५३ हजार २५४ शेतकरी कुटुंबांचा यात समावेश आहे. यापैकी १६५ कुटुंब प्रमुख तणावात जीव जगत आहेत. ३४ सौम्य आणि १३१ तीव्र स्वरूपातील तणावात आहेत.

सेलू तालुक्‍यातील २९ हजार ५३७ कुटुंबीयांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. यामध्ये २४६ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले आहे. समुद्रपूर तालुक्‍यातील २९ हजार ३९९ कुटुंबापैकी ४३, कारंजा तालुक्‍यातील १८ हजार ९४८ पैकी ५४८, देवळी तालुक्‍यातील २६ हजार ६०८ पैकी ३३५, आर्वी तालुक्‍यातील २५ हजार ९७३ पैकी १२४, आष्टी तालुक्‍यातील १२ हजार ४२५ पैकी ३४ आणि हिंगणघाट तालुक्‍यातील २७ हजार २२३ पैकी १५ शेतकरी तणावात असल्याचे आढळून आले आहे. शेतकऱ्यांमधील नैराश्‍याची कारणे 

  • हवामान बदलामुळे पाऊसमान अनिश्चित.
  • अनिश्चित हवामानामुळे कोरडवाहू पीक पद्धतीत उत्पादन बेभरवशाचे.
  • उत्पादकतेअभावी उत्पन्न व खर्चाचा ताळेबंद जुळत नाही.
  • खते, बियाणे, मजुरीसोबत शेतीमाल बाजारपेठेत आणण्यावर मोठा खर्च.
  • उत्पादकता खर्च वाढत असतानाच शेतीमालाला अपेक्षित दर न मिळणे.
  • हमीभाव किंवा अपेक्षित दराअभावी कर्जाची परतफेड अशक्‍य.
  • कुटुंबाच्या गरजांसाठी लागणाऱ्या पैशाची चणचण.
  • शेती व्यवस्थापनासाठी घेतलेल्या कर्जाचा बोजा.
  • शेतीमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नसल्याने व्यापाऱ्याने मागणी केलेल्या दरात नाइलाजास्तव विक्री.
  • सिंचन सुविधांअभावी एकाच पिकावर राहवे लागते अवलंबून.  
  • वडिलोपार्जित शेतीचे तुकडे होत गेले. दोन ते चार एकर जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली. या जमिनीतील उत्पादकता आणि उत्पन्नातून कुटुंबीयांच्या गरजा भागत नसल्याने कर्ज काढण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसतो. पुढे या कर्जाची परतफेड शक्‍य होत नाही आणि त्यातूनच तणाव वाढतो. हे थांबवायचे असेल तर ‘फार्म टू प्लेट’ अशी संकल्पना राबवावी लागेल. गावात प्रक्रिया उद्योगांची उभारणी झाल्यास त्यातून देखील गाव स्वावलंबी होत तणावाचे मळभ दूर करता येणार आहेत. - डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगूरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

    महात्मा गांधी याचे वास्तव्य खेड्याकडे चला असा नारा देणाऱ्या महात्मा गांधी यांनी जीवनातील काही काळ वर्धा जिल्ह्यात घालविला. स्वावलंबी खेड्यांचा आदर्श त्यांनी घालून दिला होता. त्याच बापूंच्या जिल्ह्यात शेतकरी तणावात आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com