स्थानिक हवामानानुसार लागवडीसाठी योग्य पिकांची निवड करावी. यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्येही शाश्वत उत्पादन मिळण्यास मदत होते. दुष्काळी भागात कमी कालावधीमध्ये येणारे, पाण्याची गरज कमी असणारे तसेच पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असणाऱ्या पिकांच्या जातींची निवड करावी. पिकाचे लागवडीपासून ते काढणी, साठवणूकीपर्यंत सर्व नियोजन हवामानावर अवलंबून असते. हवामानातील तापमान, हवेतील सापेक्ष आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा कालावधी, हवेचा वेग व दाब आणि पाऊस असा कोणताही घटक कमी अधिक झाल्यास त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होतो. तापमान
सापेक्ष आर्द्रता वातावरणामध्ये असणाऱ्या बाष्पाचे प्रमाणावरून हवेतील आर्द्रता मोजली जाते. हवेतील ६० ते ८० टक्के बाष्प पिकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. हेच बाष्पाचे प्रमाण पिकांवरील रोग झपाट्याने वाढण्यास, कीड-रोगांचा प्रसार वेगाने होण्यास कारणीभूत ठरते. तापमान कमी असल्यास आर्द्रतेचे प्रमाण अधिक राहते. याउलट तापमानात वाढ होताच आर्द्रता कमी होते. परिणामी उन्हाळ्यामध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव तुलनेमध्ये कमी होतो. उन्हाळी हंगामात पिकांवर सकाळी धुके पडल्यास आर्द्रतेचे प्रमाण वाढते. तसेच दवामुळे पिकांचे भाग ओले राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. भाजीपाला व कांदा पिकांमध्ये याचा फटका बसतो. सूर्यप्रकाशाचा कालावधी सूर्य प्रकाशाचा वापर करून वनस्पती अन्न तयार करतात. तसेच बियांची उगवण, पानांचा आकार, खोड, फुल व फळांची वाढ अशा पिकाच्या एकूणच वाढीसाठी सूर्यप्रकाश महत्त्वाचा असतो. पावसाळी हंगामामध्ये सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी राहतो. पिकांना गरजेपेक्षा कमी सूर्यप्रकाश मिळत असला तरी योग्य तापमान असल्यास पिकांची वाढ चांगली होते. सूर्यप्रकाशाच्या आवश्यक अवधीनुसार पडणारे पिकांचे तीन प्रकार आखूड दिनमानाची पिके (शॉर्ट डे) योग्य वाढीकरिता १२ तासांपेक्षा कमी सूर्यप्रकाश कालावधी आवश्यक असलेली पिके- भात, ज्वारी, मूग, बाजरी, कापूस, सोयबीन, कांदा, स्ट्राबेरी, मोगरा, तंबाखू. इ. लांब दिनमानाची पिके (लाँग डे) १२ तासांपेक्षा अधिक सूर्यप्रकाशाचा कालावधी आवश्यक असलेली पिके- गहू, हरभरा, पालक, लेट्युस, कोबी, बटाटा, मुळा, बीट, ओवा, इ. दिनमान तटस्थ पिके (डे न्युट्रल) सूर्यप्रकाशाच्या कालावधीचा काहीच परिणाम न होणारी पिके. .मका, सूर्यफूल,काकडी, टोमॅटो, गुलाब इ. हवेचा वेग व दाब
पाऊस
वातावरणातील वायू वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या वायूंवर पिकांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया अवलंबून असते. याशिवाय नायट्रोजन हा वायू पिकांना नत्र स्थिरीकरणासाठी उपयुक्त असतो. हवेत होणारे प्रदुषण वातावरणातील वायूंच्या उपलब्धतेवर, पर्यायाने पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करते. शाश्वत उत्पादनासाठी पीक नियोजन
संपर्क- बालाजी बोबडे, ७३९७९०२१०८ (वरिष्ठ संशोधन सहयोगी, कृषी हवामानशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.