सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान

अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे नुकसान
अतिवृष्टीने भाजीपाला पिकांचे नुकसान

सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील २५० हेक्टरवरील विविध भाजीपाला पिके अतिवृष्टीने बाधित झाली आहेत. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 

जिल्ह्यातील वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, दोडामार्ग या तालुक्यांमध्ये भाजीपाला पिके घेतली जातात. येथील शेतकरी गणेशोत्सव काळात भाजीपाला तयार होईल अशा नियोजनातून भाजीपाला लागवड करतात. गणेश चतुर्थीकरीता मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असतात. त्यामुळे भाजीपाला, फळांना मागणी असते. त्यामुळे शेतकरी या शेतीमालाची स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्री करुन चांगला दर मिळवतात.

या वर्षी सुद्धा येथील शेतकऱ्यांनी पडवळ, वाल, दुधी भोपळा, दोडका, कारली, भेंडी, गवार, काकडी, चिबूड, भोपळा आदी पिकांची लागवड केली होती. या सर्वच वेलवर्गीय भाज्यांना आता फळधारणा झाली होती. गणेश चतुर्थीच्या काळात यातील बहुतांशा भाज्या तयार होऊन त्या बाजारपेठेत विक्रीला येणार होत्या. परंतु सलग पाच दिवस झालेल्या अतिवृष्टीने जिल्हयातील शेकडो शेतकऱ्यांनी अडीचशेहुन अधिक हेक्टरवर लागवड केलेल्या भाजीपाला पिकांची नासाडी झाली आहे. काही ठिकाणी फळे कुजली असून काही ठिकाणी वेल वाहुन गेले आहेत.

चिबूड आणि कणगाला गोव्यात मोठी मागणी असते. या दोन्ही पिकांची लाखो रुपयांची उलाढाल होते. परंतु पावसामुळे ही पिके वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे अन्य पिकांसोबतच भाजीपाला पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com