कोल्हापूर : सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना पायदळी तुडविली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी शहरातील सर्व भाजी मंडई आणि रस्त्यावरील भाजी विक्रीही बंद केली आहे. यापुढे टेम्पोतून अथवा हातगाडीतून प्रत्येक कॉलनी अथवा गल्लोगल्ली हातगाडी नेऊनच भाजी विक्री करावी, अशा सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या.
या नियमांच्या अंमलबजावणीसाठी लक्ष्मीपुरी, पिलतीर्थसह सर्व भाजी मंडई उठविल्या आहेत. ‘कोरोना’चा वाढता प्रभाव लक्षात घेऊन मार्केटमधील गर्दी टाळण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. चार विभागीय कार्यालयांतर्गत मुख्य रस्त्यावर अंतर ठेवून पट्टे मारून भाजी विक्रेत्यांना बसविले होते.
भाजी विक्री व किराणा विक्रीच्या ठिकाणी नागरिकांनी ठराविक अंतरावर उभे राहावे, यासाठी गोलाकार, चौकोन केले आहेत. परंतु, मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे.
या ठिकाणी असलेल्या विक्रेत्यांना टेम्पोमधून अथवा हातगाडीतून मुख्य चौकात, गल्लीत, उपनगरात भाजी विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दोन विक्रेत्यांमध्ये कमीत कमी शंभर फुटांचे अंतर ठेवणे जरुरीचे केले आहे.
बंद राहिलेल्या मंडई
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.