कोल्हापुरात भाजी मंडई सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंतच सुरू

जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी बैठक घेतली. त्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच भाजी विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Vegetable market in Kolhapur in the Starting from 9 am to 3 pm
Vegetable market in Kolhapur in the Starting from 9 am to 3 pm

कोल्हापूर : शहरात भाजी मंडईची वेळ सकाळी नऊ ते दुपारी तीन करण्यात आली आहे. शहरात महानगरपालिकेतर्फे गर्दी टाळण्यासाठी भाजी मंडई बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी भाजी विक्रीचे प्रभागनिहाय विकेंद्रीकरण केले आहे. प्रत्येक प्रभागात ठरवून दिलेल्या जागेवरच २ विक्रेत्यांत ३० फूट अंतर ठेवून विक्रीची व्यवस्था केली आहे. 

याव्यतिरिक्त विक्रेत्यांनी घरोघरी जाऊन भाजी विक्री करण्यासही परवानगी दिली आहे. यापूर्वी महानगरपालिकेने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाजी विक्रीस परवानगी दिली होती. मात्र, खरेदीच्या कारणाने नागरिकांची गर्दी वाढते. त्यामुळे जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी बैठक घेतली. त्यात सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतच भाजी विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

भाजी खरेदीस गर्दी करू नये, ठरवून दिलेल्या वेळेत भाजी खरेदी करावी. अन्यथा कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com