कुलगुरू पात्रता निकषाबाबत संभ्रम कायम; बैठकीत निघाला नाही तोडगा

कृषी विद्यापीठांमधील कुलगुरू पदासाठी देशभर समान पात्रता समान नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मात्र, भारतीय कृषी संशोधन परिषदेला देखील हा संभ्रम दूर करता आलेला नाही.
कुलगुरू पात्रता निकषाबाबत संभ्रम कायम; बैठकीत निघाला नाही तोडगा
कुलगुरू पात्रता निकषाबाबत संभ्रम कायम; बैठकीत निघाला नाही तोडगा

पुणे : कृषी विद्यापीठांमधील कुलगुरू पदासाठी देशभर समान पात्रता समान नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मात्र, भारतीय कृषी संशोधन परिषदेला देखील हा संभ्रम दूर करता आलेला नाही. कुलगुरू पदासाठी सध्या विविध राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. त्यातही पुन्हा कुलगुरू निवडण्यासाठी राज्यपालाकडून नियुक्त करण्यात आलेली समिती राज्यांतर्गत देखील वेगवेगळे नियम लावते. परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी देशातील सर्व कुलगुरूंसोबत अलिकडेच घेतलेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. मात्र, कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही.  कुलगुरू परिषदेत या पात्रतेच्या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित होती. कुलगुरू निवडीची अर्हता एक असावी, असा मुद्दा एका विद्यापीठांकडून मांडला गेला. अर्थात, देशभर एकच अर्हता नव्हे तर या पदाच्या नियुक्तीची प्रक्रिया देखील समान असावी, असा आग्रह काही विद्यापीठांचा आहे.  महाराष्ट्रात एका कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाच्या निवडी प्रक्रियेत निवड समितीने एका उमेदवाराला अपात्र ठरविले होते. मात्र, चार महिन्यात दुसऱ्या निवड समितीने याच उमेदवाराला पात्र ठरविले. देशातील कृषी विद्यापीठे व फलोत्पादन विद्यापीठांमधील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना पात्रतेचे निकष समान नाहीत. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देखील समान अर्हता व प्रक्रियेतून व्हाव्यात, असे मत मांडले गेले आहे. याबाबत परिषदेकडून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.  या वैठकीत आचार्य विद्यार्थ्यांची मदत घेण्याबाबत देखील चर्चा झाली. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारित आचार्य (पीएचडी) झालेल्या विद्यार्थ्यांना मदतनीस अध्यापक (टिचिंग असिस्टंट) म्हणून नियुक्त करण्यास परिषद राजी झाली आहे. विद्यापीठांमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याने  विद्यार्थ्यांची गैरसोय होते. त्याचा परिणाम अध्ययनावर देखील होतो. आचार्य विद्यार्थ्याची मदत घेतल्यास ही समस्या सुटेल, असे विद्यापीठांचे म्हणणे आहे.  संशोधन कराराची प्रक्रिया किचकट जगातील नामवंत कृषी संशोधन संस्थांसोबत देशातील कृषी विद्यापीठांकडून केल्या जात असलेल्या संयुक्त कराराची प्रक्रिया सोपी करण्याची मागणी विद्यापीठांची आहे.  कृषी शिक्षण व संशोधनाचा दर्जा उंचावण्यासाठी असे करार केले जातात. हा मुद्दा कुलगुरू बैठकीत चर्चेला आला असताना परिषदेने विद्यापीठांना स्वातंत्र्य देण्याचे मान्य केले. “विदेशातील संस्थांसोबत करार केल्यामुळे संकल्पना व संशोधनाचे आदानप्रदान होते. मात्र, करार करताना अनेक अडचणींना विद्यापीठे सामोरे जातात. विद्यापीठांच्या कायद्यामध्येच अशा प्रकारच्या करारांना मान्यता देण्याचे समाविष्ठ असल्यास वेगळी मान्यता घेण्याची गरज नसल्याचा खुलासा केंद्र शासनाने केलेला आहे. ही पध्दत सुटसुटीत करण्याबाबत परिषदेने पुढाकार घेण्याची गरज आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com