विदर्भ थंडीने गारठला

विदर्भ थंडीने गारठला
विदर्भ थंडीने गारठला

पुणे ः विदर्भातील अनेक भागांत थंडीने कहर केला आहे. मागील शंभर वर्षांतील नागपूरमध्ये थंडीने तिसरा निच्चांक केला आहे. गेल्या वर्षी २९ डिसेंबर रोजी किमान ३.५ अंश सेल्सिअस होऊन सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यापूर्वी १२ फेब्रुवारी १९५० रोजी किमान तापमान ५.० अंश सेल्सिअस एवढे झाले होते. त्यानंतर यंदाच्या थंडीच्या हंगामात शनिवारी (ता. २८) सकाळी ५.१ अंश सेल्सिअसची तिसऱ्यांदा नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असल्याने किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. या थंडीच्या वाऱ्याचे प्रवाह विदर्भाच्या दिशेने वाहत आहेत. सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांशी भागात थंडी वाढली असून किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.   विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी या भागात ढगाळ हवामान असल्याने किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. मात्र, पुन्हा ढगाळ हवामान निवळून कोरडे हवामान झाल्यानंतर अचानक थंडीत वाढ झाली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्र असून चक्राकार स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ आहे. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात चढउतार सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशत ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे.  मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात झालेल्या पावसामुळे सकाळी अनेक ठिकाणी सकाळी धुक्याची चादर पसरत आहे. तर काही ठिकाणी पिकांवर दवबिंदू पडत असल्याची स्थिती आहे. गेल्या दोन दिवसापासून दुपारपर्यंत राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती होत असून दुपारनंतर काही प्रमाणात ऊन पडल्याने ढगाळ हवामानाची स्थिती निवळत आहे. मात्र, संध्याकाळी काही प्रमाणात गारठा वाढण्यास सुरुवात होते. वाढलेल्या गारठ्यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. कोकणातील बहुतांशी भागात किमान तापमान १८ ते २२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. किमान तापमानात मोठी घट धुळे कृषी महाविद्यालयात सर्वात कमी ६.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात किमान तापमान ११ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानामुळे गारठा किंचित वाढला आहे. किमान तापमान १० ते १४ अंश सेल्सिअसपर्यंत होते. विदर्भातील अनेक भागात गारठा वाढला आहे. यामुळे नागपूर, चंद्रपूर, बुलढाणा, गोंदिया, अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील किमान तापमान ५ ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.  शनिवारी (ता. २८) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः  अकोला ८.७ (-५), अलिबाग २०.७ (३), अमरावती ९.५ (-५), औरंगाबाद १०.९ (-१), बीड १३.५ (१), बुलढाणा ९.५ (-५), चंद्रपूर ५.२ (-७), डहाणू १८.५ (१), गोंदिया ५.२ (-७), जळगाव १०.५ (-१), कोल्हापूर १९.७ (४), महाबळेश्वर १५.० (२), मालेगाव ११.६ (१), मुंबई २०.४ (३), नागपूर ५.१ (-८), नांदेड १४.५ (२), नाशिक ११.४ (१), निफाड १५.२, धुळे कृषी महाविद्यालय ६.०, परभणी ११.३ (-२), लोहगाव १८.१ (६), पाषाण १८.४ (६), पुणे १८.३ (८), रत्नागिरी २२.६ (३), सांगली २०.१ (६), सातारा १९.७ (७), सोलापूर १९.० (३), ठाणे २०.५, वर्धा ७.५ (-५), यवतमाळ ९.० (-५).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com