विदर्भात अवकाळीने कोट्यवधी रुपयांची हानी
विदर्भात अवकाळीने कोट्यवधी रुपयांची हानी

विदर्भात अवकाळीने कोट्यवधी रुपयांची हानी

नागपूर  ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे झालेल्या संकटातून शेतकरी सावरत असतानाच विदर्भात पुन्हा पाऊस, गारपिटीचा तडाखा पिकांना बसला आहे. हजारो हेक्‍टरवरील फळबागा, कपाशी पिके बुधवारी (ता.१) रात्री झालेल्या गारपीट आणि पावसाने उद्‌ध्वस्त झाली कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज वर्तविला जात आहे. प्रशासन मात्र या नुकसानीबाबत गंभीर नसल्याचेही तथ्य समोर आले असून माहिती घेतो, असेच उत्तर अमरावती आणि नागपुरातील कृषी अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. महसूल यंत्रणा तर त्यापेक्षा निगरगट्ट निघाली असून त्यांच्याकडून प्रतिसादच मिळाला नाही.  नागपूर जिल्ह्याच्या काटोल, नरखेड तालुक्‍यातील इसापूर, झिल्पा, बोरी, मेंडकी, चिखली, गोधनी शिवारात गारपिटीमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले. मृग बहरातील संत्रा सध्या झाडावर आहे. मृग बहराचे संत्र्याचा आकार वाढीस पाऊस पोषक ठरतो. परंतु, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांच्या काही भागांत गारपीट झाल्याने मृग बहराच्या फळांचा दर्जा बिघडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. थंडीमुळे बहर फुटण्यास अडचणी येतात. बाग ताणावर सोडल्याने फुलधारणा होण्यास मदत होते. आता मात्र आंबियाची फुलधारणा आणि मृगातील फळे या दोन्ही उत्पादकांचे नुकसान झाले आहे.  वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्‍यातील शिरपूर, टाकरखेडा, लाडगाव, वर्धा मणेरी, जळगाव शिवारात गारपीट झाल्याचे बाळा जगताप यांनी सांगितले.  यवतमाळ जिल्ह्यात पाच लाख हेक्‍टरवर कापूस होतो. कापसाचा दुसरा वेचा करण्याचा विचार शेतकरी करीत होते. त्यापूर्वीच वादळी-वारा, पावसाने पिकाचे नुकसान झाले. विदर्भातील १८ लाख हेक्‍टरवरील कापूस पिकाची उत्पादकता प्रभावित होणार असल्याचे जाणकार सांगतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com