पुणे : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य भारतातील राज्यात पावसाने जोर धरला आहे. राज्याच्या पूर्व आणि उत्तर भागांतही ढगांची दाटी झाली आहे. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. २६) विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर पुणे आणि पालघर जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र रविवारी छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशाकडे सरकले होते. तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा काहीसा दक्षिणेकडे सरकून, राजस्थानच्या गंगानगरपासून, कमी दाब क्षेत्राचे केंद्रातून बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रीय होता. यामुळे मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. आज (ता. २५) उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, विर्दभातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत तसेच उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील गोंदिया येथे प्रत्येकी ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर ढगांच्या आच्छादनामुळे तापमानातही चढ उतार सुरू असून, बीड येथे सर्वाधिक ३३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्यात बहुतांशी ठिकाणी तापमान २७ ते ३२ अंशांच्या दरम्यान आहे. रविवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.