जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय ग्रामविकासाला बळकटी देणारा

जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय ग्रामविकासाला बळकटी देणारा
जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय ग्रामविकासाला बळकटी देणारा

लोकनियुक्त सरपंचांकडून समाधान व्यक्त आळंदी, जि. पुणे ः गावपातळीवर राजकारण होते, सदस्यांना संभाळण्यातच सारी ताकद खर्च होत होती. गाव विकासाची कामे करताना अडचणी आणि अडथळे येत होते. शासनाने थेट सरपंच जनतेतून निवडण्याचा निर्णय घेतला आणि सरपंचपदाची संधी मिळाली, हा निर्णय अत्यंत चांगला असून, त्याचा गाव विकासाला निश्चित फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करीत थेट जनतेतून सरपंच होण्याची संधी मिळालेल्या सरपंचांनी समाधान व्यक्त केले.  आळंदीतील सरपंच महापरिषदेत सहभागी झालेले अनेक सरपंच थेट जनतेतून निवडून आलेले आहेत. त्यांनी ‘अॅग्रोवन’शी संवाद साधला. भोईणी (ता. मुळशी) येथील अलका मरगळे म्हणाल्या, की थेट सरपंच जनतेतून निवडण्याचा अधिकार आल्याने लोकांना मोकळेपणाने सरपंच निवड करता येत आहे. गावपातळीवरील राजकारण यामुळे कमी होत आहे. आसराचीवाडी (ता. रेणापूर, जि. लातूर) येथील गोविंद नागरगोजे म्हणाले, की आधी सदस्यांतून सरपंच निवड व्हायची, पात्रता असूनही अनेकांना पदापासून दूर राहावे लागत होते. त्यामुळे आर्थिक आणि मानसिक त्रास सोसावा लागायचा. शिवाय अविश्वासाची भीती डोक्यावर कायम असायची. आता तसे होत नाही. जरी काम पटले नाही, तर गाव निर्णय घेईल. थेट लोकांनी संधी दिल्यामुळे चांगली कामे करता येत आहेत. लोकांनाही मनासारखा सरपंच निवडता येत आहे. शासनाच्या या निर्णयामुळेच युवकांना संधी मिळाली. आमच्या गावांत पंचेचाळीस वर्षांत तरुणांना संधी मिळाली नाही. ग्रामस्थच शिकलेल्या, होतकरू माणसाला संधी देत असल्याने हा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकासाला बळकटी देणारा आहे.  मी अल्पसंख्याक समाजातील, सुरवातीला आरक्षणावर सरपंच झालो. गावात पहिले पाच वर्षे चांगले काम केले. लोकांनी कौतुक केले आणि योगायोग म्हणजे थेट सरपंच जनतेतून निवडण्याची संधी आली, म्हणून दुसऱ्यांदा सरपंच झालो. हा निर्णय झाला नसता, तर काही प्रमाणात अडचणी आल्या असत्या.  -हरी पवार, पुसरा ता. वडवणी, जि. बीड.

गावगावांत प्रस्थापितांचे राजकारण चालत होते. लोकांची इच्छा असूनही सदस्यांतून निवड होत असल्यामुळे मनासारखा सरपंच निवडता येत नव्हता. सरकारच्या या निर्णयामुळे होतकरू, काम करणा-या व्यक्तीची निवड होत आहे. गाव विकासासाठी ही सर्वाधिक जमेची बाजू आहे. -विवेक र्इश्वरकट्टी, कल्लकर्जाळ, ता. अक्कटलकोट, जि. सोलापूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com