खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्री

खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामस्तरीय कृषी समितीची स्थापना करण्यात येत असून, संपूर्ण गावाची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन गावाचे, तालुक्‍याचे जिल्हावार नियोजन प्रस्तावित आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.
Village wise planning of kharif: Minister of Agriculture
Village wise planning of kharif: Minister of Agriculture

कोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी ग्रामस्तरीय कृषी समितीची स्थापना करण्यात येत असून, संपूर्ण गावाची भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन गावाचे, तालुक्‍याचे जिल्हावार नियोजन प्रस्तावित आहे. सर्व पालकमंत्र्यांकडे हे नियोजन आल्यानंतर सर्वसमावेशक आराखडा तयार करणार आहोत. यावर चर्चा करण्यासाठी कृषी अधिकारी पातळीवर आम्ही बैठका घेत आहोत, अशी माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिली.

यंदाच्या खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा कोल्हापूर येथे शुक्रवारी (ता. ९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घेतला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच रासायनिक खतांचे वाढलेले दर तातडीने कमी करावेत, अशी मागणी राज्याने केंद्राकडे पत्राद्वारे केली असल्याचीही माहिती कृषिमंत्री दादा भुसे यांनी येथे दिली.

श्री. भुसे म्हणाले, की खरिपाच्या पार्श्‍वभूमीवरच खत कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात खतांचे दर वाढविल्याने शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यामुळे राज्य सरकारने हे दर कमी करण्याची मागणी केंद्राला केली आहे. डीएपी खताच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकरी या खतापासून बाजूला जाऊन युरियाला प्राधान्य देतील, अशी शक्‍यता आहे. यामुळे नजीकच्या काळात दोन लाख टनांचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. यामुळे खत मागणीचा ताण कमी होईल.

तसेच खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा बियाणांची व खतांची उपलब्धता याला प्राधान्य देण्यात येत आहे. गेल्या वर्षी सोयाबीन बियाणाबाबत अडचण निर्माण झाली होती. यंदा कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांकडून सोयाबीन बीजोत्पादनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. या दृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. यंदा नावीन्यपूर्ण प्रयोगावर भर देण्यात येणार आहे. हे प्रयोग पाहून त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना कसा होईल याचे नियोजन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच तसेच मागणी असलेल्या वाणांची लागवड करुन शेतकऱ्यांना यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

या वेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार धैर्यशील माने, उल्हास पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे आदी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडे खतांचे वाढीव दर कमी करण्याबाबत मागणी केलेली आहे. त्याचबरोबर अगोदरच्या दरातही सवलत मिळावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. - दादा भुसे, कृषिमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com