‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना प्रतीक्षा

 संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान राबवून जलसंधारणाची उत्कृष्ट कामे करणाऱ्या गावांचा जलसंधारण विभागातर्फे पुरस्कार देऊन गौरव केला जातो. मात्र तीन वर्षांपासून पुरस्कारच जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे उत्कृष्ट कामे करणाऱ्या अनेक गावांसह व्यक्ती, संस्थांना जलयुक्त शिवार अभियानाच्या पुरस्कारांची प्रतीक्षा आहे.

राज्यातील अनेक भागांना सातत्याने दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. त्यामुळे अशा गावांतील पाणीटंचाई निवारणासाठी सातत्याने मोठा निधी खर्च करावा लागतो. मात्र दुष्काळावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासह सिंचनाची लोकसहभागातून कामे व्हावीत यासाठी २०१५ पासून राज्यात विविध जलसंधारणाच्या योजनांचा ताळमेळ घालून जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. तीन वर्षे सातत्याने टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाह अन्य निकषांनुसार गावे निवडून गावांत जलसंधारणाची कामे केली.

गावात एकोपा राहवा, लोकसहभाग वाढावा आणि अन्य गावांनाही प्रोत्साहन मिळावे, यासाठी जलसंधारणाचे उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांचा राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर रोख रकमेसह पारितोषिकांनी गौरव केला जातो. याशिवाय संस्था, व्यक्ती, उत्कृष्ट अधिकारी, पत्रकार यांनाही या पुरस्काराने गौरवले जाते. त्यासाठी सबंधित गावांकडून प्रस्ताव मागवले आहेत.

२०१६ पासून पुरस्काराच्या रकमेत वाढ केली असल्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कारच जाहीर झालेले नाहीत. आतापर्यंत अभियान सुरू झाल्यापासून फक्त एका वर्षाचे (२०१५) पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. कृषी विभाग, माहिती विभागामार्फत प्रस्ताव घेऊन त्याचे परीक्षण केले जाते. आता पुरस्कार कधी जाहीर होणार याची कृषी विभागात सातत्याने विचारणा होत असून, अनेक गावांना पुरस्काराची प्रतीक्षा आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com