विठ्ठल, सहकार शिरोमणी, सीताराम साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत

विठ्ठल, सहकार शिरोमणी, सीताराम साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत
विठ्ठल, सहकार शिरोमणी, सीताराम साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत

सोलापूर : चालू वर्षीचा ऊस गाळप हंगाम संपून पाच महिने उलटल्यानंतरही गुरसाळे येथील विठ्ठल, भाळवणी येथील शिरोमणी वसंतराव काळे आणि खर्डी येथील सीताराम साखर कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर एफआरपीची रक्कम थकित आहे. शेतकऱ्यांचे थकीत ऊस बिल मिळावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला. 

संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्‍वर जवळेकर आणि शहाजान शेख यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन दिले. तालुक्‍यातील या तीनही साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपून पाच महिने उलटल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता मिळाला नाही. सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आहेत. जनावरांना चारा नाही. शेतीमालास दर मिळत नाही. अशावेळी शेतकऱ्यांचे आपल्या हक्काचे ऊस बिल थकीत असल्याने अडचणी वाढल्या आहेत, असे निवेदनात नमूद केले आहे.  

साखर कारखान्यांकडे वारंवार मागणी करूनही ऊस बिल मिळत नसल्याने शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. ऊस बिलाअभावी अनेक शेतकऱ्यांच्या मुलां-मुलींचे विवाह देखील रखडले आहेत. पुढील आठवड्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मुलांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अशावेळी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची गरज ओळखून त्वरित ऊस बिलाचे वाटप सुरू करावे, अन्यथा साखर कारखान्यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला जाईल, असा इशाराही संघटनेने निवेदनाद्वारे दिला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com