नाशिक : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांची पडताळणी करणे आवश्यक आहे. या मतदार याद्यांचा पडताळणी कार्यक्रम पूर्ण करण्यात यावा, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य बलदेव सिंग यांनी दिल्या. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या निवडणूकविषयक विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त मुख्य आयुक्त दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, डॉ. अविनाश ढाकणे, डी. गंगाथरण, उपायुक्त रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी कुंदन सोनवणे, प्रमोद भामरे, टी. डी. हुलवाले, एस. ए. खोंडे, जितेंद्र पाटील, दत्तात्रय बोंडे आदी उपस्थित होते. ज्या मतदारसंघात ईव्हीपीचे काम कमी झाले आहे त्या मतदारसंघांत सूक्ष्मनियोजन करण्यात येऊन त्याबाबतचा आढावा निवडणूक उप जिल्हाधिकारी यांनी वेळोवळी घ्यावा. लोकसभा व विधानसभा निवडणूक कालावधीत नाशिक विभागात करण्यात आलेले कामकाज अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. सिंग यांनी केले. श्री. शिंदे म्हणाले, राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने जिल्ह्यांमध्ये झालेल्या विविध कार्यक्रमांचे व्यवस्थितरीत्या दस्तऐवजीकरण करून आयोगाला सादर करण्यात यावे. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या सूचना
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.