नंदुरबार ः जिल्ह्यात तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेज उभे राहिले. त्यात चांगला जलसंचय होऊन शेतीसाठी लाभ होत आहे. परंतु, या प्रकल्पासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना मोबदल्याची प्रतीक्षा आहे.
बारा वर्षांपासून १६ शेतकरी आपल्या जमिनीच्या मोबदल्यासंबंधी पाटबंधारे विभाग व इतर विभागांमध्ये अर्ज करीत आहेत. रोज खेटे घालत आहेत. परंतु, मोबदला मिळालेला नाही. या प्रकल्पासाठी टेंभे, हिंगणी व कमखेडा या गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनी अधीग्रहित केल्या. यातील १६ शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत.
बॅरेजमध्ये जलसंचय वाढून बॅकवॉटर जेव्हा अधिक स्थितीत पोचतो. त्या वेळेस जमिनी पाण्याखाली जातात. हा प्रकार अनेक वर्षे सुरू आहे. परंतु, त्यांच्या नुकसानीची दखल घेतली नाही.
या भागातील शेती सुपिक असून, पपई, कापूस ही पिके आहेत. यामुळे मोठे नुकसान दरवर्षी होत असते. परंतु, त्या नुकसानीचा विचार प्रशासन करीत नाही. यासंदर्भात संघर्ष करणाऱ्या १६ पैकी चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे कुटुंबीय मोबदल्याची प्रतीक्षा करीत आहेत. यासंदर्भात कार्यवाहीची मागणी केली जात आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.