गिरणाच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
गिरणाच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

गिरणाच्या आवर्तनाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा

जळगाव : जिल्ह्यातील पश्‍चिम भागाची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा नदीचे आवर्तन अजूनही जळगाव, धरणगावमधील गावांनजीक पोचले नाही. आवर्तन उशिराने सोडले. जवळपास १० दिवस होत आले तरीदेखील ते नदीच्या शेवटच्या भागात न पोचल्याने शेतकरी, ग्रामस्थ नाराज आहेत. 

गिरणा पट्टा दुष्काळी आहे. सर्वच तालुके दुष्काळी असून, त्यांना गिरणा धरणाचा आधार आहे. हे धरण सुमारे ४६ टक्के भरले होते. त्यातून पिण्याच्या पाण्यासह नदीकाठच्या शिवारातील कूपनलिका, विहिरी रिचार्ज व्हाव्यात, यासाठी आवर्तनाची मागणी केली जात होती. पहिले आवर्तन नोव्हेंबरमध्ये सोडले. दोन दिवस नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरू होता. दुसरे आवर्तन ५ जानेवारीला सोडण्याचे संकेत प्रशासनाने दिले. परंतु आवर्तन १५ जानेवारीला सोडले. ते अजूनही नदीच्या शेवटच्या भागात असलेल्या कानळदा, चांदसर, नांद्रा बुद्रुक या धरणगाव व जळगाव तालुक्‍यांतील गावांपर्यंत पोचले नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

यंदा पाऊस न झाल्याने नदीकाठी पाणीटंचाई आहे. पिण्याचे पाणी मोठ्या गावांमध्ये दोन दिवसाआड येते. जळगाव तालुक्‍यातील शिरसोलीसारख्या गावालादेखील गिरणेतील पाण्याचा आधार होतो. नदीचे पाणी शेवटच्या टप्प्यात अडविण्यासाठी कानळदासह इतर गावांमध्ये वाळूचे बंधारे बांधले आहेत. त्यावर ग्रामस्थांनी निधी गोळा करून लाखभर रुपये खर्च केला. पण पाणीच नसल्याने तो वाया जाईल की काय, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com