गिरणा, हतनूरमधून आवर्तनाची प्रतीक्षा कायम 

जळगाव ः दिवसागणिक उष्णता वाढत असून, गिरणा, तापी नदी काठच्या गावांमध्ये टंचाई वाढण्याची स्थिती आहे. गिरणा व तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी मागील महिनाभरापासून सुरू आहे. परंतु या प्रकल्पांमधून नदीत पाण्याचे आवर्तन सोडले जात नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे.
Waiting for rotation from the Girna, Hatnur
Waiting for rotation from the Girna, Hatnur

जळगाव ः दिवसागणिक उष्णता वाढत असून, गिरणा, तापी नदी काठच्या गावांमध्ये टंचाई वाढण्याची स्थिती आहे. गिरणा व तापी नदीवरील हतनूर प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी मागील महिनाभरापासून सुरू आहे. परंतु या प्रकल्पांमधून नदीत पाण्याचे आवर्तन सोडले जात नसल्याने शेतकरी, ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. 

गावांतील विहिरींची घटलेली पातळी, पाणीटंचाईची शक्‍यता याच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांनी गिरणा, हतनूर प्रकल्पातून आवर्तनाची मागणी केली आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्‍नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पाणी नदीत सोडण्यासंबंधी आदेश निर्गमीत करावेत, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

गिरणा नदीकाठच्या सुमारे १०० गावांमधील विहिरी, सार्वजनिक पाणीपुरवठा जलस्त्रोत आटू लागले आहेत. शिवारात केळी, लिंबू, मोसंबीच्या बागा आहेत. तापी नदीकाठीदेखील केळी व फळ पिकांची शेती आहे. शिवारातील कूपनलिका, विहिरींची जलपातळी घटत आहे. यामुळे नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. 

धुळे जिल्ह्यात पांझरा नदीवरील अक्कलपाडा प्रकल्पातून तातडीने पांझरा नदीपात्रात आवर्तन सोडण्याची मागणी विविध गावांतील ग्रामपंचायतींसह राजकीय पक्ष, पदाधिकारी, संस्था, संघटनांतर्फे होत होती. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी अक्कलपाडातून आवर्तन सोडण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आवर्तन सोडण्यात आले. यामुळे धुळे, शिंदखेडा व अमळनेर (जि. जळगाव) तालुक्‍यांतील नदीकाठच्या सुमारे ९० गावांना दिलासा मिळाला आहे. 

काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४३ अंशांवर गेला आहे. यामुळे रब्बी हंगामातील काही पिकांनाही पाण्याची आवश्‍यकता होती. तसेच पांझरा नदीकाठच्या धुळे, शिंदखेडा, अमळनेर तालुक्‍यांतील सुमारे ९० गावांच्या विहिरीही आटू लागल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. तसेच पशुधनाच्या पाण्याचाही प्रश्‍न निर्माण झाला होता. यामुळे अक्कलपाडातून त्वरित नदीपात्रात आवर्तन सोडावे, अशी आग्रही मागणी होत होती. या आवर्तनामुळे नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com