वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू

शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातून डाव्या कालव्याद्वारे शिराळा, वाळवा आणि कऱ्हाड (जि. सातारा) या तीन तालुक्यासाठी वरदान असलेली वाकुर्डे उपसा सिंचन योजना सुरू केली आहे.
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू Wakurde Upsa Irrigation The cycle of the scheme begins
वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू Wakurde Upsa Irrigation The cycle of the scheme begins

सांगली : शिराळा तालुक्यातील चांदोली धरणातून डाव्या कालव्याद्वारे शिराळा, वाळवा आणि कऱ्हाड (जि. सातारा) या तीन तालुक्यासाठी वरदान असलेली वाकुर्डे उपसा सिंचन योजना सुरू केली आहे. या योजनेतून तिन्ही तालुक्यातील लाभ क्षेत्रातील तलाव भरून देण्यात येणार असल्याची माहिती वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या सूत्रांनी दिली.

वाकुर्डे उपसा सिंचन योजनाच्या लाभ क्षेत्रातील सांगली आणि सातारा जिल्ह्यातील तीनही तालुक्यातील ४१ हजार ११० हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे. मात्र, त्यापैकी २८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. मात्र, या योजनेतून आवर्तनाची मागणी होत असली तरी आवर्तन सोडले जात नाही.

गेल्या दोन ते तीन वर्षांत वाळवा, शिराळा आणि कऱ्हाड तालुक्यात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पाणी टंचाई भासली नाही. मुळात शिराळा तालुका हा अतिपावसाचा तालुका, अशी ओळख आहे. त्यामुळे या तालुक्यात पाणीटंचाई भासत नाही. मात्र, गेल्या वर्षांपासून या तालुक्यातील असणारे पाझर तलाव कोरडे पडू लागले आहे. त्यामुळे ऊस पिकांसह उन्हाळी पिकांना पाणी टंचाई भासते.

दरम्यान, कऱ्हाड तालुक्याचा दक्षिण भागात म्हणजे, उंडाळे, ओंड या गावात पाणी टंचाई असते. मुळात या गावाला दक्षिण मांड नदी असली तरी, ती दर वर्षी उन्हाळ्यात कोरडी पडलेले असते. त्यामुळे नदीकाठची शेतीला पाणी टंचाई भासते. त्यामुळे कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी दरवर्षी योजनेचे पाणी सोडण्याची मागणी करतात. परंतु वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजनेचे दोन ते तीन आवर्तन होतात. दुष्काळी पट्ट्यात पाणी मिळते. पाणी मिळत असल्याने पाणीपट्टी देखील वसूल होत असते. त्यातही या योजनेच्या लाभ क्षेत्रात साखर कारखाने असल्याने पाणीपट्टी या कारखान्यांच्या माध्यमातून वसूल होण्यास मदत होते. मात्र, वाकुर्डे उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडले तर पाणीपट्टी वसूल होण्यास अडथळे निर्माण होतात.

पाटबंधारे विभागाकडे वसुलीसाठी उपाययोजना नाहीत. त्यामुळे आवर्तन होत नाही. जरी त्या तीन तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी, उन्हाळ्यात पाणी टंचाई भासतेच. त्यामुळे या लाभ क्षेत्रात असलेले तलाव कोरडे पडतात. त्यामुळे योजना सुरू करून तलाव भरून द्यावे, अशी मागणी असते.

यंदा लोकप्रतिनिधींनी योजना सुरू करून पाणी सोडण्यासाठी सूचना दिल्याने योजना सुरू झाली असून, तलाव भरून देण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, पाणी प्रश्न मिटेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com