वर्धा जिल्ह्यात ३४,४५९ शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

वर्धा जिल्ह्यात ३४,४५९ शेतकऱ्यांनी काढला पीकविमा
वर्धा जिल्ह्यात ३४,४५९ शेतकऱ्यांनी काढला पीकविमा

वर्धा  ः सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सोसणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पिकाला विम्याचे कवच दिले आहे. नगदी पिकासाठी पाच टक्‍के तर तृणधान्य आणि कडधान्य पिकासाठी २ टक्‍के असे एकूण ६ कोटी ९५ लाख ७ हजार ४८१ रुपये संरक्षित रक्‍कम म्हणून भरले आहेत.  कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षीच्या खरिपात नुकसानीपोटी नाममात्र शेतकऱ्यांना ४५ लाख रुपयांची भरपाई विमा कंपीनकडून देण्यात आली होती. त्या वेळी इफ्को टोकीयो कंपनीविरोधात शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. विमा योजना ही शेतकऱ्यांऐवजी कंपनी हिताची असल्याचेही आरोप झाले. त्यामुळे यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांचा विमा योजनेला प्रतिसाद मिळणार नाही किंवा तो कमी मिळेल, अशी शक्‍यता वर्तविली जात होती. परंतु, यावर्षीच्या खरिपात एकूण ३४ हजार ४५९ शेतकऱ्यांनी पिकाला विमा संरक्षण दिले आहे. यावर्षी २६ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत वर्धा जिल्ह्यात झालेल्या पावसाचा एकूण ४२७.८३ हेक्‍टरवरील पिकांना फटका बसला आहे. १६२.९८ हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टक्‍क्‍यांच्या आत तर २६४.८५ हेक्‍टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. जिल्ह्यातील सुमारे ६१४ शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातून आजवर सुमारे ८७ तक्रारी करण्यात आल्या असून यातील सर्वाधिक तक्रारी आर्वी तालुक्‍यातील आहेत. कापणीपूर्वी गटात ४६ तर कापणी पश्‍चात गटात ४१ शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com