...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार कमी

Water charges will be low for Takari scheme
Water charges will be low for Takari scheme

सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची नवीन धोरणानुसार आखणी होत आहे. शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे ८१ः१९ या धोरणाप्रमाणे लवकरच पाणीपट्टी आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे योजनेची पाणीपट्टी कमी होणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

ताकारी उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात कडेगाव, पलूस, तासगाव आणि खानापूर हे चार तालुके समाविष्ट असून येथील सुमारे २७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. या योजनेमुळे या तालुक्यांमधील पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीबाबत शासनाने ८१ः१९ असा निर्णय घेतला होता. मात्र, अद्यापही या धोरणानुसार पाणीपट्टी आकारली जात नव्हती. त्यासाठी नव्या धोरणाची आखणी केली आहे. या योजनेत किती क्षेत्र ओलिताखाली येत आहे.

शेतकरी संख्या किती आहे, यासह विविध माहिती नव्याने संकलित होत आहे. नव्या धोरणानुसार असलेली पाणीपट्टी गतवर्षीच्या (२०१८-१९) हंगामापासून लागू होणार आहे. त्यामुळे यावर्षीच्या ऊसा बिलातून कपात होणारी पाणीपट्टी निश्चितच कमी असेल. 

लाभक्षेत्रातील ऊस उत्पादकांकडून ऊस बिलातून पाणीपट्टीची वसूली होत आहे. त्यानुसार पाण्याचे नियोजन व देखभाल दुरुस्तीसह वीजबिलापोटी येणारा खर्च पाणीपट्टी, करासह ही वसुली शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून होत असते. मात्र, या वर्षी योजनेची सर्व आवर्तने शासनाच्या ८१ः१९ योजनेत बसली आहेत. त्यामुळे शासन वीजबिलाची ८१ टक्के रक्कम भरणार आहे व शेतकऱ्यांना १९ टक्के रक्कम पाणीपट्टी म्हणून द्यावी लागणार आहे. त्यामुळे पाणीपट्टी कमी होणार आहे. याचा फायदा या योजनेच्या चार तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com