सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी

सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर धरणातून पाणी

नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी चणकापूर धरणातून येत्या दोन दिवसांत पाणी सोडण्यात येणार आहे.

यंदा नोव्हेंबरमध्येच आवर्तन सोडावे लागत असल्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर झाल्याची स्थिती आहे. यंदा कमी पाऊस झाला असून, पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ७५ टॅँकरद्वारे सुमारे तीनशे गावे, वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

कमी पर्जन्यमानाचा सर्वाधिक फटका बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याला बसला आहे. चणकापूर धरणातून चारशे दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. चणकापूरमधून सटाणा येथील आरम नदीपर्यंत पाणी येईल व तेथून कालवामार्गे ते मालेगाव येथील तळवाडे साठवण तलावापर्यंत जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com