सातारा जिल्ह्यात २९४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी पाणीटंचाई जैसे थे असून, टॅंकरची संख्या कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. सध्या जिल्ह्यातील सर्वच ११ तालुक्यांतील २५७ गावे व १०११ वाड्यावस्त्यांवर २९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

जिल्ह्यातील अनेक भागांत वादळी पावसाने हजेरी लावली असतानाही पाणीटंचाई कमी झालेली नाही. या उलट टँकरच्या संख्येत वाढ सुरूच असून, तीनशेकडे वाटचाल सुरू आहे. अजूनही अकरा तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या २५७ गावे व १०११ वाड्यावस्त्यांवरील चार लाख ८२ हजार २८२ नागरिकांना २९४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. 

माण तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. या तालुक्यात ११६ टॅंकरद्वारे ८० गावे आणि ६२८ वाड्यावस्त्यांवरील एक लाख ४० हजार ५०४ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. या तालुक्यात टँकरची मागणी वाढली आहे. खटाव तालुक्‍यात ४६ टँकरद्वारे ५५ गावे व १७४ वाड्यावस्त्यांवरील एक लाख तीन हजार २८२ लोकसंख्येस पाणीपुरवठा केला जात आहे. कोरेगाव तालुक्‍यात ३८ टँकरद्वारे ३३ गावे व एका वाडी वस्तीवरील ४९ हजार ९२५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खंडाळा तालुक्यात दोन टँकरद्वारे तीन गावांतील १२४३ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात ५० टँकरद्वारे ४४ गावे व १७८ वाड्यावस्त्यांवरील एक लाख ४७ हजार ३६ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

वाई तालुक्यात सात टॅंकरद्वारे आठ गावे व चार वाड्यावस्त्यांवरील सहा हजार ३८३ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. पाटण तालुक्यात सहा टँकरद्वारे दोन गावे, सात वाड्यावस्त्यांवरील ४३८४ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. जावली तालुक्यात १६ टँकरद्वारे १४ गावे, १२ वाड्यावस्त्यांवरील १५ हजार ७५१ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. महाबळेश्वर तालुक्यात चार टँकरद्वारे सात गावे व दोन वाड्यावस्त्यांवरील ३६६४ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा तालुक्यात एक गाव व पाच वाड्यावस्त्यांवरील ३६६४ नागरिकांना एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. कराड तालुक्यात सात टँकरद्वारे दहा गावांतील ९२२१ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.  १५६ विहिरींचे अधिग्रहण संरक्षित पाण्यासाठी विहीर अधिग्रहणात वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात १५६ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ३५, खटावमधील ६०, कोरेगावमधील १०, खंडाळ्यातील १, फलटणमधील सहा, वाईमधील २०, पाटणमधील १, जावलीतील १३, महाबळेश्वरमधील सहा, कराडमधील चार विहिरींचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com