पावसामुळे सातारा जिल्ह्यातील टॅंकरची संख्या घटली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यातील पश्चिम भागात अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसान झाले असले तरी पूर्व भागातही पावसाने हजेरी लावल्याने पाणीटंचाई कमी झाली आहे. जिल्ह्यात सध्या ११५ टँकरद्वारे १०१ गावे व ६९८ वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात टँकरची संख्या कमी होण्यास मदत झाली आहे. जून महिन्याच्या सुरवातीपर्यंत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. या काळात टँकरची संख्या तीनशेपर्यंत गेली होती. पावसाने हजेरीस उशीर लावल्यामुळे टँकरची संख्या वाढण्याची शक्यता होती. मात्र, गेल्या १५ दिवसांत जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चित्र बदलून गेले आहे. पश्चिम भागात अतिवृष्टी झाली. पूर्व भागात कमी अधिक स्वरूपात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

या भागातील टंचाई कमी झाल्याने टँकरच्या संख्येत घट झाली असून सध्या ११५ टँकरव्दारे १०१ गावे व ६८९ वाड्यावस्त्यांवरील एक लाख ७० हजार ६३५ नागरिकांना पुरवठा केला जात आहे. यामध्ये माण तालुक्यात ९५ टँकरद्वारे ७६ गावे व ५७४ वाड्या वस्त्यांवरील एक लाख ४० हजार २३२ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. खटाव तालुक्यात १३ टँकरद्वारे १८ गावे व ८३ वाड्यावस्त्यांवरील १४ हजार ६५८ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण तालुक्यात सात टँकरद्वारे सात गावे व ४१ वाड्यावस्त्यांवरील १५ हजार ७४५ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

संरक्षित पाण्यासाठी ४० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये माणमधील ३१, खटावमधील आठ व फलटण तालुक्यातील एका विहिराचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com