सातारा : प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घट

प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घट
प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात घट

सातारा : कमी पर्जन्यमानाचा परिणाम जिल्ह्यातील प्रमुख धरणांवर दिसू लागला आहे. सर्व प्रमुख धरणांत गतवर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात दिवसेदिवस पाणी टंचाई तीव्र होऊ लागल्याने धरणांतील पाणी जून अखेर पुरेल या पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे.

कोयना राज्यासाठी लागणारी वीजनिर्मिती; तसेच जलसिंचनासाठी कोयना धरण सर्वात महत्त्वाचे आहे. या धरणात गतवर्षीच्यी तुलनेत ३.०९ टीएमसी कमी पाणीसाठा झाला आहे. या धरणात गतवर्षी ६४.८१ टीएमसी पाणीसाठा होता. या वर्षी तो ६१.७२ टीएमसी आहे.

कोयना धरणाप्रमाणे इतर धरणातही पाणीसाठा कमी आहे. माण, खटाव या दुष्काळी तालुक्यासाठी महत्वाच्या असलेल्या उरमोडी धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. या धरणात गतवर्षी ७.२८ टीएमसी, तर या वर्षी ३.६७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षीच्या तुलनेत ३.६१ टीएमीसी पाणीसाठा कमी आहे. अजूनही तीन ते साडेतीन महिने या धरणातील पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे.

धरणाच्या टक्केवारीचा विचार करता कोयना धरणात ६१.६४, धोम धरणात २८.३३, कण्हेर धरणात ४४.५७ , उरमोडी धरणात ३८.१०, तारळी धरणात ६१.०९, धोम-बलकवडी धरणात २९.५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दुष्काळाच्या झळा वाढत आहेत. त्यामुळे पाणी काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

प्रमुख धरणांतील तुलनात्मक स्थिती (टीएमसी)

धरण २०१९ २०१८
कोयना  ६१.७२ ६४.६१
धोम  ३.३१ ७.७९
उरमोडी  ३.६७ ७.२८
कण्हेर ४.२८ ७.९७
धोम-बलकवडी १.१७ २.०५
तारळी ३.५६ ३.३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com