नांदेड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. यात हदगाव, हिमायतनगरसह बिलोली तालुक्यात शिल्लक राहिलेल्या सोयाबीन, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे कापून ठेवलेले सोयाबीन वाहून गेले. तर, काढणी केलेला शेतमाल भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे पुन्हा मोठे नुकसान झाले.
सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यातून शेतकरी सावरत असताना शनिवारी (ता.१६) परतीच्या पावसाने हदगाव, हिमायतनगर, माहूर, बिलोली, मुखेड, कंधार, अर्धापूर, उमरी, धर्माबाद आदी तालुक्यांना झोडपून काढले. पावसाचे प्रमाण हदगाव तालुक्यात अधिक राहिले. त्यामुळे निवघा, तळयी, मनाठा, आष्टी, पिंपरखेड, तामसा या सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या सोबतच बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी मंडळातही अतिवृष्टी झाली.
जिल्ह्यातील इतर मंडळातही जोरदार पाऊस झाला. यामुळे मागील अतिवृष्टीत शिल्लक राहिलेल्या सोयाबीनसह कपाशी, तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापून ठेवलेले सोयाबीन भिजून गेले. तर काही ठिकाणी काढलेल्या धान्याची नासाडी झाली. यामुळे अडचणीतील शेतकरी सततच्या नुकसानीमुळे धास्तावले आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.