कोल्हापूर: जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी अनेक धरणांतून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आल्याने नद्यांचे पाणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी महापुरामुळे झालेल्या हानीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यंदा सावधतेने पावले उचलताना स्थलांतर सुरु केले आहे. शुक्रवारी (ता.७) दुपारपर्यंत जिल्ह्यातील २३ गावांतील दोन हजार कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले होते.
दरम्यान, करवीर, शिरोळ तालुक्यातील अनेक ग्रामस्थ स्वत:हून स्थलांतरित होत आहेत.
गुरुवारी सायंकाळी सात वाजता राधानगरी धरणांचे दरवाजे उघडून भोगावती नदीत विसर्गास प्रारंभ झाला. शुक्रवारी(ता.७) दुपारी एक वाजेपर्यंत राधानगरी धरणाच्या चार दरवाजातून एकूण ७११२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. भोगावती व पंचगंगा नदीच्या पाण्याची वाढ होत असल्याने पूरस्थिती कायम आहे. दुपारी एकपर्यंत पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ ४४ फूट ९ इंच इतकी होती. धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. धोका पातळीपेक्षा दीड फूट जादा पातळीवर पंचगंगेचे पाणी आले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चांदोली धरणातून साडेचार हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत असल्याने वारणा नदीचे पाणीही वाढू लागले आहे. पर्यायाने कृष्णा नदीच्या पाण्यातही मोठी वाढ होत असून शिरोळ तालुक्याला पुराचा धोका निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या चोवीस तासात जिल्ह्यातील ३८ मार्ग बंद झाले आहेत. यामध्ये दहा राज्य मार्ग व २८ जिल्हा मार्ग आहेत. जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, कोदे लपा आदि लघुप्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. कासारी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. कडवी, कुंभी, पाटगाव आदी प्रकल्प ८० टक्के भरले आहेत. काळम्मावाडी धरणात ८३ तर चांदोली धरणात ८४ टक्के पाणीसाठा आहे. चिकोत्रा प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा आहे. दुधगंगा, कडवी कासारीतून विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पात्रात वाढ कायम आहे.
जिल्ह्यातील स्थिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.