गहू पिकासाठी पाणी व्यवस्थापन

जमिनीच्या मगदुराप्रमाणे गहू पिकाला १५ ते २० दिवसांच्या अंतराने विविध अवस्थेत पाणी द्यावे. मुकूटमुळे, फुटवे, फुलोरा आणि दुधाळ अवस्था या अत्यंत महत्त्वाच्या असून या काळात पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
as per growth stage provide the irrigation to the wheat crop
as per growth stage provide the irrigation to the wheat crop

जमिनीच्या मगदुराप्रमाणे गहू पिकाला १५ ते २० दिवसांच्या अंतराने विविध अवस्थेत पाणी द्यावे. मुकूटमुळे, फुटवे, फुलोरा आणि दुधाळ अवस्था या अत्यंत महत्त्वाच्या असून या काळात पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. जमिनीच्या मगदुराप्रमाणे गहू पिकाला १५ ते २० दिवसांच्या अंतराने विविध अवस्थेत पाणी द्यावे. मुकूटमुळे, फुटवे, फुलोरा आणि दुधाळ अवस्था या अत्यंत महत्त्वाच्या असून या काळात पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. सिंचनाची उपलब्धता कमी असल्यास पाणी पाळ्याचे नियोजन खालील प्रमाणे करावे. दाणे पक्व होण्याच्या अवस्थेत पिकास पाणी देऊ नये. त्यामुळे पीक लोळण्याची व बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता असते. अशा लोळलेल्या पिकात उंदरांचा प्रादुर्भावही जास्त होतो. वाढीच्या प्रमुख अवस्था आणि पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर होणारे परिणाम  मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी- (पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी) या वेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुटमुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत. फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येतो. उत्पादनात घट येते. फुटवे फुटण्याची अवस्था- (पेरणीनंतर ३५-४० दिवसांनी)  ओंब्या कमी बाहेर पडतात. बाहेर पडलेल्या ओब्यांची लांबी कमी होते व पर्यायाने उत्पादनात घट येते. पीक फुलोऱ्यात येण्याची अवस्था- पेरणीनंतर ६०-७० दिवसांनी)  परागीभवन कमी होऊन दाण्याची संख्या घटते व पर्यायाने उत्पादन घटते. दाण्यात चीक भरण्याची अवस्था- (पेरणीनंतर ८०-९० दिवसांनी)  या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो व वजन कमी होते. दाणे भरण्याची अवस्था((पेरणीनंतर ९०-१०० दिवसांनी) 

  • या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ट होते. पर्यायाने उत्पादनात घट येते.
  • या अवस्थेत पिकास आवश्यकतेनुसार हलके पाणी द्यावे. अन्यथा टाळावे. कारण पाणी दिले तर पीक लोळण्याची व बुरशीजन्य रोग येण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अशा लोळलेल्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव जास्त होण्याची शक्यता असते.
  • पाण्याचे योग्य नियोजन ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसे प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास व एक ते पाच पाणी देणे शक्य असल्यास ते पुढील प्रमाणे दयावे.  

    ओलिताची उपलब्धता पाणी देण्याची वेळ (पेरणीपासून दिवसांनी)
    एक ओलिताची सोय ४२
    दोन ओलिताची सोय २१, ६४
    तीन पाणी देणे शक्य असल्यास २१, ४२, ६५
    चार पाणी देणे शक्य असल्यास २१, ५५, ७०, ९०
    पाच पाणी देणे शक्य असल्यास २१, ४२, ६४, ७५, ९०

    आंतरमशागत

  • पेरणीपासून पीक ३० ते ४५ दिवस तणविरहीत ठेवावे. अन्यथा उत्पादनात ३० ते ३५ टक्के घट येते.
  • पेरणी नंतर २१ ते ३० दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पीक कांडी अवस्थेत आल्यानंतर मजुरांच्या साहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकाची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते.
  • गव्हात चांदवेल, हरळी, माठ, चंदन बटवा यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. गरजेनुसार एक किंवा दोन खुरपणी, तसेच कोळपणी करून जमीन मोकळी करावी. आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
  • संपर्क ः डॉ. विजेंद्र बाविस्कर- ८३७४१७४७९७ (लेखक अखिल भारतीय समन्वित गहू संशोधन प्रकल्प, आघारकर संशोधन संस्था, पुणे येथे कार्यरत आहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com