जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेच

जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेच
जळगाव जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील प्रकल्प कोरडेच

जळगाव : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढला नसला तरी त्यात किंचितशी वाढ झाली आहे. तापी नदीवरील हतनूर धरणाच्या सहा दरवाज्यांमधून विसर्ग मात्र सुरूच आहे.   मुक्ताईनगरनजीकच्या हतनूर धरणाचे सहा दरवाजे अर्ध्या मीटरने उघडे आहेत. त्यातून १४७ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणात मध्य प्रदेशात जोरदार पाऊस झाल्याने पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. या क्षेत्रात सोमवारी (ता.२३) १२ मिलिमीटर पाऊस झाला.

जिल्ह्यातील सुमारे २१ हजार हेक्‍टरला भिजविणाऱ्या गिरणा नदीवरील गिरणा धरणाचा साठा मागील चार दिवसांत सात टक्‍क्‍यांनी वाढून २२ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. वाघूर नदीवरील कंडारी (ता. जळगाव) नजीकच्या वाघूर धरणाचा साठा मागील चार दिवसांत फक्त एक टक्‍क्‍याने वाढला असून, त्यात ३४.९६ टक्के जलसाठा झाला आहे.

सातपुडा पर्वतालगतच्या सुकी प्रकल्पात ४० टक्के, मंगरूळ प्रकल्पात ४४ टक्के, तर मोर प्रकल्पात २२ टक्के जलसाठा आहे. अभोरा प्रकल्पातील साठ्यातही मोठी वाढ झालेली नाही. मंगरूळ प्रकल्प जोरदार पावसाअभावी पूर्ण भरला नसल्याची माहिती मिळाली.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक आहेत. त्यात अंजनी, भोकरबारी, बहुळा, अग्नावती, मन्याड आदींचा समावेश आहे. जामनेर तालुक्‍यातील तोंडापूर प्रकल्पातही २० टक्केपेक्षा कमी साठा आहे. वाघूर, गिरणा, अंजनी या नद्यांना अद्याप पूर आलेला नाही. शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com