रत्नागिरी जिल्ह्याची पाण्याची सरासरी पातळी ०.१४ मीटर

रत्नागिरी ः उन्हाचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे.
Water of Ratnagiri district Average level 0.14 m
Water of Ratnagiri district Average level 0.14 m

रत्नागिरी ः उन्हाचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम भूजल पातळीवर होऊ लागला आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस आलेल्या अहवालानुसार मागील पाच वर्षांच्या सरासरीनुसार चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यातील पाणी पातळीत किरकोळ घट दर्शवते. जिल्ह्याची सरासरी पातळी ०.१४ मीटर इतकी आहे.

यंदा मोसमी पाऊस उशिरापर्यंत राहिल्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी राहील, असा अंदाज होता. यावर्षी पहिला टँकर उशिराने धावला. अजूनही टँकरची मागणी करणाऱ्या गावांची संख्या कमी आहे. भूजल पातळीसह मे महिन्यापर्यंत टंचाईविषयी अंदाज घेण्यासाठी भूजल विभागाकडून मार्चच्या अखेरीस सर्व्हेक्षण करण्यात आले. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मागील पाच वर्षातील सरासरी आकडेवारी ०.१४ मीटरने वाढली आहे. 

मार्च २०२१ मध्ये केलेल्या सर्व्हेक्षणात जिल्ह्यातील सरासरी पातळी ६.१० मीटर आहे. टंचाईची तीव्रता कमी राहील, असा अंदाज आहे; मात्र काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीनुसार टँकरची गरज भासू शकते. मार्च महिन्यात पारा ३८ ते ४० अंशापर्यंत काही काळ स्थिर होता. एप्रिल महिन्यातही तीच परिस्थिती आहे.

जिल्ह्यात सध्या १२ गावातील १४ वाड्यांमध्ये सहा टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. त्यात रत्नागिरी, खेड, लांजा, चिपळूण आणि मंडणगड तालुक्याचा समावेश आहे. गतवर्षी पाणीपुरवठा करणाऱ्या‍ गावांची संख्या दुप्पट होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com