जायकवाडी उजव्या कालव्यातून पाण्याच्या विसर्गास प्रारंभ

जायकवाडी विसर्ग
जायकवाडी विसर्ग

पैठण, जि. औरंगाबाद : सुरू असलेल्या आवकेमुळे जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ सुरूच आहे. त्यामुळे शनिवारी (ता. १०) दुपारी १ वाजताच्या सुमारास धरणाचा एकूण पाणीसाठा २३७७.६३५ दलघमी (८३.९४ टीएमसी) झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी (ता. ९) धरणाच्या उजव्या कालव्यातून ४०० क्‍युसेक पाणी माजलगाव धरणाच्या दिशेने सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग आजही सुरूच होता.  धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पहिल्यांदाच हे पाणी सोडण्यात आले आहे. वाढत असलेल्या पाणीसाठ्यामुळे धरणाला  तहसीलदार महेश सावंत, पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यामध्ये पोलिस सुरक्षा व पाणीपातळी नियोजनाची माहिती घेऊन सूचना देण्यात आल्या. या वेळी धरण नियंत्रण कक्षातील कनिष्ठ अभियंता अनिकेत हसबनीस, बबन बोधणे यांनी पाणीपातळीची माहिती त्यांना दिली होती. पाहणीवेळी धरणात सकाळी पाण्याची आवक ३० हजार क्‍युसेकने होती.  शुक्रवारी दिवसभरात आवक कमी-अधिक वाढ झाली असली, तरी रात्रीतून पाण्याची आवक वाढण्याची शक्‍यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास जायकवाडीत ३१४२७ क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू होती. जायकवाडीतील जीवंत पाणीसाठा १६३९.५२९ दलघमीवर (५७.८८ टीएमसी)  पोहोचला होता. सोबत उजव्या कालव्यातून ४०० क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच होता. उजव्या कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याप्रमाणे डाव्या कालव्यातही पाणी सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com