कोयनेसह पाच धरणांतून विसर्ग

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत जोरदार पावसाने हजेरी लावली. परिणामी प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढत असल्याने कोयनेसह पाच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाण्याची आवक वाढली आहे. हा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाकडून रविवारपासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धोम-बलकवडी धरणाचा अपवाद वगळता इतर पाच प्रमुख धरणांतून विसर्ग सुरू आहे. यामध्ये कोयना धरणातून सर्वाधिक विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना येथे ८४, नवजा येथे ७०, महाबळेश्वर येथे २३, वळवण येथे २५ मिमी पाऊस झाला. सध्या कोयना धरणात प्रतिसेंकद ८६६४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. चार दरवाजे एक फुटाने उचलून ८४६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात आहे. कोयना धरणात एकूण १०५.०३ टीएमसी म्हणजेच ९९.७९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच धोम धरणातून १९२, उरमोडी धरणातून ४५०, कण्हेर धरणातून ११५१, तारळी धरणातून १०७० क्युसेक विसर्ग सुरू आहे. यामुळे कोयना, उरमोडी, कृष्णा, तारळी या नदयांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com