सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडले

सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडले
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडले

सोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर शहरासाठी शनिवारी (ता. २३) सायंकाळी दोन हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली. त्यात आणखी वाढ करून तो सात ते आठ हजार क्युसेक करण्यात येणार आहे. सध्या उजनी धरणातील पाणी पातळी उणेत आहे. आता हे पाणी सोडण्यात आल्याने त्यात आणखी घट होणार आहे.

सोलापूर शहरात पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडला आहे. त्यासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. एप्रिलमध्ये पाणी सोडण्याचे शासनाचे नियोजन होते. पण त्या आधीच टंचाईची तीव्रता वाढल्याने धरणातून पाणी सोडण्यात आले.

वीजनिर्मिती प्रकल्पासाठी १६०० क्युसेक आणि गाळमोरीतून ४०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांची दारे उघडण्यात आली आहेत. तसेच मुख्य कालवा, भीमा-सीना जोडकालवा, दहिगाव उपसा सिंचन याद्वारेही पाणी सोडले जात आहे. 

उजनी जलाशयात सध्या उणे ५.४८ टक्के इतका पाणीसाठा खाली आला आहे. येत्या काही दिवसांत त्याची पातळी आणखी खाली जाणार आहे. त्यामुळे पाणी संकट आणखी गडद होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com