पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत पाणीटंचाई कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस झाल्याने धरणे ओसंडून वाहत आहेत. नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. दुसरीकडे ऑगस्ट महिना संपत आला असतानाही बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदरसह आंबेगाव तालुक्यांमधील कोरडवाहू भागांत पाणीटंचाई कायम असल्याचे चित्र आहे. या पाच तालुक्यांतील ३७ गावे आणि २६० वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असल्याने ४२ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

उन्हाळ्यात जिल्ह्यातील मावळ वगळता सर्व तालुक्यांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे भरली. पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करावा लागला. त्यामुळे नद्यांना पूर आले. पुण्यातील धरणांमधून सोडलेल्या पाण्याने मृतपातळीत गेलेल्या उजनीत १०० टक्के पाणीसाठा झाला. मात्र, जिल्ह्यातील बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांतील काही गावांमध्ये अद्यापही पिण्यायोग्य पाणी उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे या भागांतील तब्बल ८३ हजारांहून अधिक लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी ४२ टॅंकर धावत आहेत. 

शुक्रवारपर्यंत (ता. २३) तालुकानिहाय पाणीटंचाई स्थिती 
तालुका  गावे वाड्या  टॅंकर
आंबेगाव
बारामती १० १०९ १३
दौंड ५०
इंदापूर १२ ५८ १४
पुरंदर  ७  ३६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com