शासकीय फळ रोपवाटिकांना पाणीटंचाईचा फटका

शासकीय फळ रोपवाटिकांना पाणीटंचाईचा फटका
शासकीय फळ रोपवाटिकांना पाणीटंचाईचा फटका

पुणे ः खरीप हंगामात कृषी विभागामार्फत फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात येते. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील शासकीय फळबाग रोपवाटिकेत मोठ्या प्रमाणात रोपे तयार करण्यात येतात. मात्र, चालू वर्षी पाणीटंचाईचा फटका या रोपवाटिकांना बसू लागला आहे. त्यामुळे खरीप हंगामात फळबाग लागवडीसाठी कमी प्रमाणात रोपे उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षापासून पांडुरंग फुंडकर योजनेमार्फत व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कार्यक्रम देण्यात येतो. या योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी या शासकीय रोपवाटिकांचा मोठा फायदा होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना ही रोपे घेऊन या योजनेतून विविध फळझाडाची लागवड केली जाते. गेल्या दोन वर्षी २०१७-१८ मध्ये ८३२ हेक्टरवर लागवड झाली होती. तर गेल्या वर्षी पांडुरंग फुडकर फळबाग लागवड योजनेतून दोनशे ते तीनशे हेक्टरवर फळबाग लागवड झाल्याचे चित्र आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आंबा, डाळिंब, द्राक्षे, लिंबू, मोसंबी, चिकू, सीताफळ, बोर अशा विविध फळझाडांची लागवड करता येते.

सध्या जिल्ह्यात कृषी विभागाच्या सहा फळ रोपवाटिका आहेत. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती फळरोपवाटिका ही खेडमध्ये आहे. तर तालुस्तरीय फळरोपवाटिका ह्या जुन्नर, शिरूर, भूकूम (मुळशी), संदुबरे, बारामती येथे आहेत. येथे दरवर्षी आंबा, पेरू, चिकू, सीताफळ, चिंच, डाळिंब, जांभूळ, फणस, लिंबू, आवळा, नारळ अशी विविध रोपे तयार केली जातात. ही कलमे रोपे तयार झाल्यानंतर त्यांची दुसऱ्या वर्षी लागवडीसाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जातात. यंदाही जूनपासून फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना या रोपवाटिकेतून रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

या शिवाय खासगी रोपवाटिकाही उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बांधावर, शेतावर अशा कोणत्याही ठिकाणी फळझाडाची लागवड करता येते. गेल्यावर्षी या रोपवाटिकेत एक लाख ७० हजार ३२७ रोपे उपलब्ध  झाले होते. मात्र, यंदा पाणीटंचाईची झळ रोपवाटिकांना चांगलीच बसू लागल्याने रोपांच्या संख्येत कमालीची घट होण्याची शक्यता आहे.

दरवर्षी आम्ही ७५ हजारांपर्यंत रोपे तयार करतो. यंदा पाणीटंचाई भासू लागली आहे. रोपांना ठिंबक सिंचनाने व झारीने पाणी दिले जाते. आता उष्णता जास्त असल्याने रोपांना चांगलीच झळ बसू लागली आहे. फळबाग लागवडीसाठी सुमारे ५० हजार रोपे उपलब्ध होतील. शिरूर, जुन्नर या ठिकाणीही पाणी टंचाई तीव्र आहे. - एन. एस. भोसले, कृषी अधिकारी, जिल्हा फळरोपवाटिका, राजगुरुनगर,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com