नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर

नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीर

नंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे. नंदुरबार तालुक्‍यात सर्वांत गंभीर स्थिती आहे. नवापूर, शहादामध्ये हे संकट वाढले आहे. या पार्श्‍वभूमीवर तातडीचा उपाय म्हणून जिल्ह्यात नऊ गावांमध्ये तात्पुरत्या पाणी योजनांना मंजुरी देण्यात आली. तसेच ५० विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. 

जिल्हाधिकारी तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी बैठक घेतली. तहसीलदारांनी गावपातळीवर भेट देऊन टंचाई परिस्थितीचा आढावा घ्यावा. आवश्‍यकतेनुसार आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविल्यास त्याला तत्काळ मंजुरी देण्यात येईल. तातडीच्या उपाययोजनांबाबतची माहिती देखील सादर करावी, असे निर्देश मंजुळे यांनी दिले. 

उमर्दे (ता. नंदुरबार) गावाला सहा महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. ग्रामस्थ टॅंकरने विकतचे पाणी घेत आहेत. सातशे रुपयांना एक टॅंकर पाणी मिळते. पाणीटंचाई गावाच्या पाचवीला पुजली आहे. कामे सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, अशी स्थिती आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सरपंच अरविंद भिल यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली.

तापी नदीवरून गावास पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला आहे. वडवद येथे कूपनलिका खोदून उमर्दे गावाला पाणीपुरवठा सुरू करावा. मात्र, निधी कमी पडत आहे. ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरून निधी उभारला. पाणीटंचाई सोडविण्याचा ग्रामपंचायतीकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, कमी पावसामुळे भूजलपातळी खोल गेल्याने समस्या येत आहेत, असे सरपंच अरविंद सोनवणे म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com