वाशीम जिल्ह्यात पाणीटंचाईत दरदिवसाला वाढ

वाशीम जिल्ह्यात पाणीटंचाईत दरदिवसाला वाढ
वाशीम जिल्ह्यात पाणीटंचाईत दरदिवसाला वाढ

वाशीम : जिल्ह्यात पाणीटंचाई दरदिवसाला वाढत चालली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापर्यंत जिल्ह्यात १४५ जलस्रोत्राचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तर १६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात भीषण निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या तुलनेत उपाययोजना तोकड्या पडत आहेत.  वाशीम जिल्ह्यातील रिसोड या तालुक्‍यात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या तालुक्‍यामध्ये १०० गावे आहेत. या तालुक्‍यात एकूण तीन टॅंकर्स सुरू करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यातील ६ तालुक्‍यांमध्ये एकूण १६ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणार्थ जिल्ह्यात आतापर्यंत १४५ विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची दक्षता घेण्यात आली आहे.  दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत असल्याने नागरिकांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. परिणामी, शासकीय उपाययोजना कमी राहत आहेत. अनेक गावांतील प्रस्ताव हे अद्यापही धूळखात पडले आहेत. तर अनेक गावांतील अधिग्रहण केलेल्या विहिरी, कूपनलिका या केवळ नावापुरत्याच असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.  ग्रामीण भागातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकरची संख्या वाढवावी, तसेच मुबलक पाणी असलेल्या विहिरी किंवा कूपनलिका अधिग्रहित कराव्या, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com