पुणे जिल्ह्यात तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पाणीटंचाई कमी

गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला आहे. जलसंधारणाच्या कामांमुळे पाणी जिरल्याने यंदा विहिरींना चांगले पाणी आहे. त्यामुळे यावर्षी टंचाई जाणवेल असे वाटत नाही. लोणी भापकर, पळशी, सायंबाची वाडी, जळकेवाडी भागात पाणीटंचाई नाही. - मनोहर भापकर, सायंबाची वाडी, बारामती, जि. पुणे.
पाणीसाठा
पाणीसाठा

पुणे : जलसंधारण कामांमध्ये झालेल्या पाणीसाठ्यामुळे भूजल पातळी वाढली असून यंदा जिल्ह्यात पाण्याची स्थिती चांगली आहे. कायम दुष्काळी भागातही यंदा एप्रिल महिन्यात टॅंकर सुरू करावे लागलेले नाहीत. पुढील काळात उन्हाचा चटका वाढून काही ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. मात्र गेल्या तीन वर्षांतील एप्रिल महिन्याची स्थिती पाहता यंदा पाणीटंचाई खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे. 

 जिल्ह्यातील आंबेगाव आणि बारामती तालुक्‍यांमध्ये २०१५ मध्ये पाणीटंचाई भासली होती. या दोन्ही तालुक्‍यांमधील २ गावे २५ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ५ टॅंकर सुरू करण्यात आले होते. सलग दोन वर्षे अपुरा पाऊस झाल्याने २०१६ मध्ये जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता खूपच वाढली होती.

जिल्ह्यातील ४१ वाड्या आणि ४२५ वस्त्यांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागवावी लागली होती. आंबेगाव, दौंड, इंदापूर, पुरंदर तालुक्‍यांमध्ये टंचाईच्या तीव्र झळा होत्या. २०१७ मध्येही पुरंदर तालुक्‍यातील ४ गावे आणि ३३ वाड्यांना ९ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

गतवर्षी पावसाळ्यात शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस पडला होता. यातच जलयुक्त शिवार अभियानातून जिल्ह्यात जलसंधारणांच्या कामांमध्ये पाणीसाठा झाला. त्यामुळे यंदा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई भासलेली नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com