पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेय

पाणीटंचाई
पाणीटंचाई

पुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील पाणीटंचाई वाढतच आहे. विभागातील ५४ गावे १६६ वाड्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी ४९ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. या टॅंकरच्या पाण्यावर सुमारे ७५ हजारांहून अधिक लोकसंख्या आणि ८ हजार जनावरांची तहान भागत असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

विभागातील सातारा जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. साताऱ्यातील ४० गावे ११९ वाड्यांमधील सुमारे ५२ हजार लोकसंख्या आणि ७ हजार ७९५ जनावरांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३५ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील ९ गावे ४४ वाड्यांमधील १ लाख ६० हजार लोकांना ११ टॅंकरने पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यातील पाच गावे आणि १ वाडी-वस्तीवरील ६७०० लोकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. खानापूर तालुक्यात पाणीपुरवठा करण्यासाठी तीन टॅंकर सुरू आहेत.

गेल्या काही वर्षांमध्ये कोल्हापूरमध्ये प्रथमच पाणीटंचाईच्या झळा बसत असल्याचे दिसून येत आहे. दुर्गम भागातील दोन वाड्यांमध्ये टंचाई भासल्याने ६७१ लोकसंख्या अाणि २९० पशुधनाला पाणीपुरवठा करण्यासाठी दोन जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. टंचाईग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी विभागात २१ विहिरी किंवा बोअरवेल या जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

विभागातील तालुकानिहाय टॅंकर स्थिती ः सातारा : माण १०, जावळी ७, खटाव ५, कोरेगाव ५, महाबळेश्‍वर ३, पाटण २, वाई २, खंडाळा १. पुणे : भोर ३, बारामती ३, आंबेगाव ३, पुरंदर २. सांगली : खानापूर ३.

विभागातील पाणीटंचाईची स्थिती

जिल्हा  गावे  वाड्या लोकसंख्या पशुधन टॅंकर
पुणे  ४४  १६३५६ ११
सातारा ४० ११९ ५१६२७ ७७९५ ३५
सांगली  ६७८२ ० 
काेल्हापूर ०  ६७१ २९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com