पारनेर, संगमनेरमध्ये २२ टॅंकरने पाणीपुरवठा

पाणीटंचाई
पाणीटंचाई

नगर : जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. भरपावसाळ्यात जिल्ह्यामधील दोन तालुक्‍यांतील २० गावे आणि ७९ वाड्या-वस्त्यांना २२ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. यंदा उन्हाळ्यात टॅंकरची गरज पडली नाही, मात्र आता पाऊस नसल्याने पावसाळ्यात टॅंकरची मागणी वाढत आहे. नगर जिल्ह्यामध्ये मागील चार-पाच वर्षांत दुष्काळी परिस्थितीमुळे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. दुष्काळाची तीव्रता, सिंचनाचा अभाव यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या सुमारे आठशेपर्यंत गेली होती. पाणीपुरवठ्यावर प्रशासनाला तब्बल ६० कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च करावी लागली होती. गेल्या दोन वर्षांत जिल्हाभरात ‘जलयुक्त शिवार’ची कामे झाली असल्याने टंचाईची तीव्रता कमी झाली. गतवर्षीपेक्षा यंदाच्या उन्हाळ्यात तर अवघे तीस टॅंकर लागले.

यंदा मात्र पावसाळा सुरू होऊन दोन उलटले आहेत. तरीही अजून पुरेसा पाऊस नाही. नगर जिल्ह्यातील पूर्वेकडील तालुक्‍यात परतीचा पाऊस पडत असतो. त्यामुळे साधारण पोळ्यानंतर हा पाऊस पडतो, असे सांगितले जात आहे. असे असले तरी यंदा जिल्ह्याच्या कोणत्याच भागात पाऊस नसल्याने पिके तर धोक्‍यात आली आहेतच, पण पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण होत आहे. सध्या दोन तालुक्‍यांतील २० गावे आणि ७९ वाड्यावस्त्यांना २२ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. काही दिवस अशीच परिस्थिती राहिली, तर टॅंकरची संख्या वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com