नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना बंद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला; मात्र अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ४९९ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत.

जलस्रोत कोरडे पडल्याने योजनांखालील लाभार्थी गावांतील जनतेला पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अनेक गावांत ऐन पावसाळ्यात टॅंकर सुरू आहेत. जुलैचा तिसरा आठवडा संपला, तरी जिल्ह्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात टॅंकर व चारा छावण्या सुरू आहेत.

जिल्ह्यात १४४६ स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहेत. त्यातील ९०४ योजना रडतखडत सुरू आहेत. ५४२ योजना वेगवेगळ्या कारणांनी बंद असून, त्यापैकी ४९९ योजना या केवळ उद्‌भवास पाणी कमी असल्याच्या कारणाने उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच बंद पडल्या आहेत. कर्जत तालुक्‍यातील नऊ पाणीयोजनांची पाइपलाइन खराब झाल्याने त्या बंद आहेत. राहुरी तालुक्‍यातील एक पाणीयोजना थकीत वीजबिलामुळे, तर एक दूषित पाण्याच्या उद्‌भवामुळे बंद ठेवली आहे. नगर तालुक्‍यातील पाच योजनांचे पाणी दूषित असल्याने त्याही बंद ठेवाव्या लागल्या आहेत. श्रीगोंदे तालुक्‍यात आठ, कर्जत तालुक्‍यात सात, तर जामखेड तालुक्‍यातील दहा पाणीयोजना कायमस्वरूपी बंद पडल्या आहेत.   

पाणीयोजनांची स्थिती
तालुका   एकूण योजना  बंद योजना
अकोले १५७ ० 
संगमनेर १८३ १०
कोपरगाव  ८४  ०२
राहाता  ५५ ०३
राहुरी ५५ ०६ 
श्रीरामपूर ८५
नेवासे ५१  ३३
शेवगाव ३१ ०७ 
पाथर्डी  १३० ६१
नगर ७५ ४७
पारनेर १६९  ९१ 
श्रीगोंदे  १४५ ६७
कर्जत   १२० ८०
जामखेड  १०६ ९२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com