मध्य खानदेशात १०० गावांत पाणीटंचाई

मध्य खानदेशात १०० गावांत पाणीटंचाई
मध्य खानदेशात १०० गावांत पाणीटंचाई

जळगाव : पावसाळा सुरू होऊन एक महिना झाला तरी जोरदार पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाई कायम आहे. खानदेशात (धुळे व जळगाव) सुमारे १०३ गावे टंचाईग्रस्त असून, टॅंकरची संख्याही पूर्वीएवढीच आहे.

जवळपास जिल्ह्यात सर्वाधिक ३८ टंचाईग्रस्त गावे अमळनेरात आहेत. पारोळा, पाचोरा, भडगाव येथेही टंचाई आहे. सोबतच कूपनलिकांचे पाणी कमी झाल्याने अनेक ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी केला आहे.

मोठ्या ग्रामपंचायती दोन दिवसाआड पिण्याचे पाणी देत आहेत. जोरदार पाऊस नसल्याने पाणीसाठ्याची स्थिती सुधारलेली नाही. जिल्ह्यातील कासोदा, नशिराबादसारख्या ग्रामपंचायतींसमोर पुरेसे पिण्याचे पाणी देण्याची अडचण आहे.

खानदेशचा मध्य भाग म्हणजेच अमळनेर, शिंदखेडा, धुळे तालुक्‍यांचा पूर्व भाग, भडगाव, पारोळा, पाचोरा तालुक्‍यांतील काही भागात पाण्याची समस्या बिकट आहे.

त्यात शिंदखेडा तालुक्‍यात समस्या अधिक आहे. धुळे तालुक्‍यातही कापडणे, न्याहळोद, लामकानी भागात हवा तसा पाऊस नसल्याने समस्या बिकट आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमधील पाणी पातळी कमी होत आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढे पाण्याचे संकट वाढून टॅंकरही वाढवावे लागतील, अशी शक्यता आहे.

जिल्हा :  पाणीटंचाईग्रस्त गावांची संख्या

जळगाव   ७३
धुळे  ३५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com