खानदेशातील २०० गावांत पाणीटंचाई

खानदेशातील २०० गावांत पाणीटंचाई
खानदेशातील २०० गावांत पाणीटंचाई

जळगाव : खानदेशात हिवाळ्यातच टंचाईग्रस्त गावांची संख्या सुमारे २०० पर्यंत पोचली आहे. काही गावांमध्ये दोन दिवसाआड, तर काही गावांमध्ये सात ते आठ दिवस पाणीच येत नसल्याची स्थिती आहे. सर्वत्र टॅंकरची व्यवस्था करणे प्रशासनालाही शक्‍य नसल्याचे चित्र आहे. टंचाई जाणवत असलेल्या गावांमधून तात्पुरत्या उपाययोजनांची मागणी, प्रस्ताव येत आहेत. 

टंचाई आराखडा यंदा वाढवावा लागेल. नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार व पूर्व शहादा भागांत टंचाई आहे. परंतु सुमारे आठ टॅंकर एकट्या नंदुरबार तालुक्‍यात सुरू आहेत. ग्रामपंचायती उपाययोजना करून हतबल झाल्या आहेत. कारण स्राेतांना पाणीच नाही. विहिरी, कूपनलिका खोल केल्या, नव्या कूपनलिका खोदल्या, तरीही पाणी भूगर्भातच नसल्याने अडचणी आहेत. सप्टेंबरमध्ये नंदुरबार व धुळ्यात फक्त चार दिवस किरकोळ पाऊस झाला. सरासरीच्या ६५ टक्केही पाऊस नंदुरबार, धुळे, शिंदखेडा व शिरपूर भागांत झाला नाही. तापी, गोमाई, पांझरा नदी काठी स्थिती बरी आहे.

जळगाव जिल्ह्यात गिरणा, तापी आणि वाघूर धरणांच्या क्षेत्रातील गावांमध्ये चित्र बरे आहे. परंतु अमळनेरचा पश्‍चिम भाग, पारोळ्याचा धुळे नजीकचा व उत्तरेकडील भाग दुष्काळाच्या झळा सोसत आहे. या भागात कुठलेही पीक हाती आले नाही. टंचाई अगदी दसरा सणापासून आहे. धुळे जिल्ह्यात सुमारे नऊ व जळगावात ११ टॅंकर सुरू असल्याची माहिती मिळाली. एका टॅंकरवर दोन ते चार गावांमध्ये पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे. 

जळगाव जिल्ह्यात जवळपास ९६, धुळ्यात ६५ व नंदुरबारात ४० गावांमध्ये टंचाई स्थिती तीव्र आहे. टंचाई आराखड्यावर सुधारणा करून काम करण्याची वेळ आळी असून, टंचाईग्रस्त गावांची जशी संख्या वाढेल, तशा उपाययोजनाही हाती घेतल्या जातील. सध्या प्रशासनाची कसरत सुरू आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com