नांदेडसह बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत नागरिकांची पाण्यासाठी वणवण

चार जिल्ह्यांत नागरिकांची पाण्यासाठी वणवण
चार जिल्ह्यांत नागरिकांची पाण्यासाठी वणवण

लातूर  : दुष्काळाच्या झळा अजूनही सुरूच आहेत. अलीकडे जोरदार पाऊस झालेल्या नांदेडसह बीड, लातूर व उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील ८ लाख ३७ हजार ७५० लोकांची तहान अजूनही टॅंकरवर अवलंबून आहे. या पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी ४३० टॅंकर सुरू आहेत. 

नांदेड, बीड, उस्मानाबाद व लातूर या चार जिल्ह्यांतील २५२ गावे, वाड्यांवर भरपावसाळ्यात पाणीटंचाईला तोंड देण्याची वेळ आली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील २१ गावे, २० वाड्यांसह बीड जिल्ह्यातील ६ गावे, लातूर जिल्ह्यातील ७० गावे, २० वाड्या, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक १५५ गावे, १० वाड्यांचा समावेश आहे. 

नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या ४१ गावे, वाड्यांमधील ४८ हजार ३८५  लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी २४ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील ६ गावातील १ लाख ८४ हजार ४४३ लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ९६ टॅंकर सुरू आहेत. लातूर जिल्ह्यातील ९० गावे, वाड्यांमधील १ लाख ८९ हजार ८३९ टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठ्यासाठी ९१ टॅंकरची सोय करण्यात आली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील १६५ गावे, वाड्यांमधील ४ लाख १५ हजार ५३ टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी २१९ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत टंचाईग्रस्तांच्या तुलनेत ६४ हजार ८०१ लोकांची घट  झाली. १० गावे, १ वाड्यांचीही संख्या घटली आहे. टंचाईग्रस्तांच्या संख्येत झालेल्या घटीमुळे २१ टॅंकरही गत आठवड्याच्या तुलनेत घटल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com