नगर ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने जिल्ह्यातील ४८२ गावे आणि पावणेतीन हजार वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई कायम आहे. तेथे लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ६२७ टँकर सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. महिना उलटूनही पुरेसा पाऊस नसल्याने ग्रामीण भागात टंचाईची तीव्रता कायम आहे.
नगर जिल्ह्याने गेल्या वर्षभरात दुष्काळाच्या झळा सोसलेल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाईमुळे लोकांना हाल सोसावे लागले. सगळ्या भागातील जलस्रोत आटल्याने जिल्हाभरात टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. टँकरचा आकडा तब्बल साडेआठशेच्या पुढे गेला होता. या महिनाभराच्या काळात काही प्रमाणात पाऊस झाल्यामुळे टॅंकरचा आकडा खाली आला असला, तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने अनेक भागात पाणीटंचाई तीव्र आहे.
सध्या जिल्हाभरातील ४८२ गावे आणि २७७५ वाड्यावस्त्यांना ६२७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यात फक्त कोपरगाव आणि श्रीरामपूर तालुक्यात एकही टॅंकर सुरू नसला, तरी अन्य तालुक्यांत पिण्याचे पाणी टॅंकरने पुरवावे लागत आहे. एक महिना उलटला तरी अजूनही पुरेसा पाऊस पडत नसल्याने पेरण्यादेखील रखडलेल्या आहेत. पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने लोक त्रस्त आहेत. तालुकानिहाय टँकर संख्या ः संगमनेर ६१, अकोले २, राहुरी ३, नेवासा ३९, राहता १०, नगर ६३, पारनेर ११२, पाथर्डी ७५, शेवगाव ५०, जामखेड ५८, श्रीगोंदा ७२, कर्जत ८२.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.