खानदेशात पाणीटंचाईच्या फायली रखडल्या

खानदेशात पाणीटंचाईच्या फायली रखडल्या
खानदेशात पाणीटंचाईच्या फायली रखडल्या

जळगाव : खानदेशात पाणीटंचाई वाढली आहे. टॅंकरची संख्या १५० पर्यंत पोचली असून, टॅंकर व इतर उपाययोजनांच्या मागणीसंबंधी अनेक ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर केले आहेत. परंतु, ते प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईत अडकल्याची स्थिती आहे. 

शेतकरीदेखील सध्या तलाठ्यांकडून सातबारा उतारा मिळत नसल्याने तलाठी कार्यालयात चकरा मारीत आहेत. तलाठी दुसरीकडेच निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. ते भेटत नाहीत. मोबाईलवर संपर्क केला तर प्रतिसाद देत नाहीत. अगदी असाच प्रकार ग्रामसेवक व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांबाबत घडत अाहे. सरपंचांना ते कार्यालयात भेटत नाहीत. अनेक ग्रामसेवक तर महिनाभरापासून गावातील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात आलेले नाहीत. यामुळे पाणीटंचाईसह विकास कामांच्या इतर फायली मार्गी लावणे अशक्‍य झाले आहे. 

जिल्हा परिषद, तहसीलदार कार्यालयाकडे पाणीटंचाईवर उपाययोजनांबाबतच्या अनेक फायली, प्रस्ताव मागील १०दिवसांपासून रखडले आहेत. गावोगावी पाण्याचे स्रोत आटले आहेत. विहीर खोलीकरण, नव्या कूपनलिका तयार करूनही पुरेसे पाण्याचे स्रोत सापडत नसल्याची स्थिती असून, टॅंकरशिवाय पर्याय नाही. 

२०० विहिरी अधिग्रहित धुळ्यातील शिंदखेडा व धुळे, नंदुरबार, पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव, धरणगाव, अमळनेर, पारोळा, बोदवड या भागात टंचाई स्थिती बिकट बनत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी धुळे, जळगाव व नंदुरबारात सुमारे २०० विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. तसेच १२५ पेक्षा अधिक तात्पुरत्या उपाययोजना राबविल्या आहेत. परंतु पाण्याची समस्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. टॅंकर मागणीचे प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्याचा मुद्दा सरपंच, ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com